Lockdown: महाराष्ट्राची धावपटू प्राजक्ता गोडबोलेची दुहेरी झुंज, कोरोना संकटात लोकांकडून मिळणाऱ्या मदतीवर गुजराण करतंय कुटुंब

कोविड-19 मुळे महाराष्ट्राच्या नागपूरची धावपटू प्राजक्ता गोडबोले दुहेरी संकटाचा सामना करत आहेत. प्राजक्ताची आई बेरोजगार आहे, तर काही काळापूर्वी तिचे वडील अर्धांगवायू झाले होते ज्यामुळे आता त्यांना उपासमारीचा सामना करावा लागत आहे. पुढच्या वेळी अन्न मिळेल की नाही हे त्यांना माहिती नाही.

प्राजक्ता गोडबोले (Photo Credit: Screengrab/Youtube)

जगभरासह भारतालाही करोना विषाणूच्या (Coronavirus) प्रादुर्भावाचा फटका बसलेला आहे. यामुळे करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे (Lockdown) खेळाडूंनाही अनेक संकटांना तोंड द्यावे लागत आहे. कोविड-19 मुळे महाराष्ट्राच्या नागपूरची धावपटू प्राजक्ता गोडबोले (Prajakta Godbole) दुहेरी संकटाचा सामना करत आहेत. प्राजक्ताची आई बेरोजगार आहे, तर काही काळापूर्वी तिचे वडील अर्धांगवायू झाले होते ज्यामुळे आता त्यांना उपासमारीचा सामना करावा लागत आहे. पुढच्या वेळी अन्न मिळेल की नाही हे त्यांना माहिती नाही. 24 वंशीय प्राजक्ता तिच्या पालकांसह नागपुरातील सिरासुपेठ झोपडपट्टीत राहत आहे. 2019 मध्ये इटलीमधील (Italy) वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्समध्ये प्राजक्ताने 5000 मीटर शर्यतीत भारतीय विद्यापीठांचे प्रतिनिधित्व केले. तिने 18:23.92 ची वेळ नोंदवली पण अंतिम फेरीसाठी पात्र होऊ शकली नाही. या वर्षाच्या सुरुवातीला झालेल्या टाटा स्टील भुवनेश्वर हाफ मॅरेथॉनमध्ये तिने दुसरे स्थान पटकावले. तिचे वडील विलास गोडबोले पूर्वी सुरक्षारक्षक म्हणून काम करत होते परंतु अपघात झाला आणि त्यांना आता अर्धांगवायू झाला आहे.

दुसरीकडे, प्राजक्ताची आई एका खानपान सेवेत स्वयंपाकीण म्हणून काम करायची आणि महिन्याला 5000 ते 6000 रुपये कमवायची. प्राजक्ताची आई तीन जणांच्या कुटुंबातील उत्पन्नाचा एकमेव स्रोत होती. परंतु लॉकडाउनमुळे विवाह होत नाहीत आणि प्राजक्ता आणि तिचे आई-वडील दिवसातले दोन वेळेचं जेवण कसे मिळवतात या आश्चर्यकारक वास्तवाला सामोरे जात आहेत. “आम्ही आता जवळपासच्या भागातील लोकांकडून दिल्या जाणाऱ्या मदतीवर जिवंत आहोत. त्यांनी आम्हाला तांदूळ, डाळ आणि इतर वस्तू दिल्या. त्यामुळे आम्हाला पुढच्या दोन-तीन दिवसांत काहीतरी खायला मिळेल पण त्यानंतर काय होईल हे मला ठाऊक नाही. हा लॉकडाउन आमच्यासाठी निर्दयीपणाची गोष्ट ठरली आहे,” असे एका व्याकूळ झालेल्या प्राजक्ताने पीटीआयला सांगितले.

“मी प्रशिक्षणाचाही विचार करत नाही तर या परिस्थितीत मी कसे जगू शकेन हे मला ठाऊक नाही. आयुष्य आमच्यासाठी खूप कठोर आहे. लॉकडाउनमुळे आमचा नाश झाला आहे,” ती पुढे म्हणाली. दुसरीकडे, लॉकडाउन कधी उचलला जाईल आणि ती आपले काम सुरू करू शकतील याचा विचार ती नेहमीच करत असल्याचे आई अरुणा म्हणाली. “आम्ही खूप गरीब कुटुंब आहोत परंतु मी माझ्या नोकरीतून मिळणाऱ्या पैशाने तरी जगू शकू. मला 5000 ते 6000 रुपये मिळायचे परंतु मला आता तेही मिळू शकत नाही. कोणतेही उत्पन्न नाही आणि आमच्याकडे पैसेही नाही. आम्ही इतरांच्या मदतीवर किती काळ जगू हे आम्हाला माहित नाही,” ती म्हणाली.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement