IND vs BAN: टीम इंडियामध्ये अचानक मोठा बदल, शेवटच्या वनडेसाठी कुलदीप यादवचा संघात समावेश
शुक्रवारी संघात बदल करताना बीसीसीआयने शेवटच्या वनडेसाठी गोलंदाज कुलदीप यादवचा संघात समावेश केला आहे.
IND vs BAN: बांगलादेशविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यांमध्ये अनेक खेळाडू दुखापतीमुळे भारतीय संघ त्रस्त आहे. दुसऱ्या वनडेनंतर कर्णधार रोहित शर्मा आणि दीपक चहर जखमी झाले. आणि पहिल्या वनडेनंतर कुलदीप सेनलाही दुखापत झाली होती. अशा स्थितीत तिसऱ्या वनडेआधीच मालिका गमावलेल्या भारतीय संघात मोठा बदल पाहायला मिळत आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यातील मालिकेतील शेवटचा वनडे सामना 10 डिसेंबर रोजी चट्टोग्राम येथे होणार आहे. यासाठी टीम इंडियाच्या संघात थोडा बदल करण्यात आला आहे.
शुक्रवारी संघात बदल करताना बीसीसीआयने शेवटच्या वनडेसाठी गोलंदाज कुलदीप यादवचा संघात समावेश केला आहे. तर दीपक चहर आणि कुलदीप सेन यांना बेंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) मध्ये रिपोर्ट करण्यास सांगितले आहे. याशिवाय कर्णधार रोहित शर्मा दुसऱ्या एकदिवसीय सामन्यानंतरच मुंबईला रवाना झाला असून तो शेवटच्या वनडेतून बाहेर पडणार आहे. अशा परिस्थितीत केएल राहुल कर्णधारपदाची धुरा सांभाळेल आणि कुलदीप यादव आता शेवटच्या वनडेच्या प्लेइंग 11 मध्ये दिसू शकतो.