IND vs AUS 4th Test: चौथा कसोटी सामना राहिला अनिर्णित, टीम इंडियाने मालिका 2-1 ने जिंकली

हा मालिकेतील शेवटचा सामना होता आणि तो अनिर्णित राहिल्यानंतर भारताने पुन्हा एकदा बॉर्डर-गावसकर मालिकेवर कब्जा केला. टीम इंडियाने दिल्ली आणि नागपूरमध्ये ही मालिका जिंकली आणि इंदूरमध्ये पराभवाचा सामना करावा लागला.

Team India (Photo Credit - Twitter)

भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात अहमदाबाद येथे खेळला गेलेला चौथा कसोटी सामना अनिर्णित राहिला. या सामन्यात नाणेफेक जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी 480 धावा केल्या. याला प्रत्युत्तरात भारतीय संघाचा डाव 511 धावांवर संपुष्टात आला. त्याचवेळी, सामना संपेपर्यंत ऑस्ट्रेलियाच्या संघाने दुसऱ्या डावात 175 धावा केल्या होत्या. हा मालिकेतील शेवटचा सामना होता आणि तो अनिर्णित राहिल्यानंतर भारताने पुन्हा एकदा बॉर्डर-गावसकर मालिकेवर कब्जा केला. टीम इंडियाने दिल्ली आणि नागपूरमध्ये ही मालिका जिंकली आणि इंदूरमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे ही मालिका 2-1 अशी बरोबरीत सुटली.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement