IND vs SA 2nd ODI: श्रेयस अय्यरच्या शतकाच्या जोरावर भारताचा 7 गडी राखून विजय, मालिकेत 1-1 अशी बरोबरी

दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेत भारतासमोर 279 धावांचे लक्ष्य ठेवले आणि भारताने तीन विकेट्स गमावून हे लक्ष्य गाठले.

Photo Credit - Twitter

भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना (2nd ODI) भारताने सात गडी राखून जिंकला. दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेत भारतासमोर 279 धावांचे लक्ष्य ठेवले आणि भारताने तीन विकेट्स गमावून हे लक्ष्य गाठले. ईशान किशन आणि श्रेयस अय्यर यांच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर टीम इंडियाने 45.5 षटकांत तीन गडी गमावून ही धावसंख्या गाठली. या विजयासह भारतीय संघाने तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. मालिकेतील तिसरा आणि निर्णायक वनडे आता 11 ऑक्टोबर रोजी नवी दिल्लीत खेळवला जाईल.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now