IND vs SA 2nd ODI: श्रेयस अय्यरच्या शतकाच्या जोरावर भारताचा 7 गडी राखून विजय, मालिकेत 1-1 अशी बरोबरी

दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेत भारतासमोर 279 धावांचे लक्ष्य ठेवले आणि भारताने तीन विकेट्स गमावून हे लक्ष्य गाठले.

Photo Credit - Twitter

भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना (2nd ODI) भारताने सात गडी राखून जिंकला. दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेत भारतासमोर 279 धावांचे लक्ष्य ठेवले आणि भारताने तीन विकेट्स गमावून हे लक्ष्य गाठले. ईशान किशन आणि श्रेयस अय्यर यांच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर टीम इंडियाने 45.5 षटकांत तीन गडी गमावून ही धावसंख्या गाठली. या विजयासह भारतीय संघाने तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. मालिकेतील तिसरा आणि निर्णायक वनडे आता 11 ऑक्टोबर रोजी नवी दिल्लीत खेळवला जाईल.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement