IND vs AUS, 2nd T20: रोहितची झंझावती खेळी; टीम इंडियाने दुसरा सामना 6 विकेटने जिंकला, मालिकेत 1-1 ची बरोबरी

भारताकडून कर्णधार रोहित शर्माने 46 धावा केल्या.

नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा 6 गडी राखून (IND vs AUS) पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने 8 षटकांत 91 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताने 4 चेंडू राखून 6 विकेट्स राखून सामना जिंकला. भारताकडून कर्णधार रोहित शर्माने 46 धावा केल्या. 91 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात चांगली झाली. कर्णधार रोहित शर्माने सुरुवातीच्या षटकांमध्ये अनेक षटकार ठोकत संघाला चांगली सुरुवात करून दिली. भारताची पहिली विकेट तिसऱ्या षटकात केएल राहुलच्या रूपाने आली. राहुल 6 चेंडूत 10 धावा करून बाद झाला. विराट कोहली 6 चेंडूत 11 धावा करून बाद झाला.

Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement