IND vs SA 2nd T20I: भारताची दमदार फलंदाजी, आफ्रिकेला जिंकण्यासाठी 238 धावांचे लक्ष्य

नाणेफेक हारल्यानंतर फलंदाजीचा निर्णय घेत भारतीय संघाच्या सलामीवीरांनी चांगली सुरुवात केली. रोहित आणि राहुल यांच्यात पहिल्या विकेटसाठी 59 चेंडूत 96 धावा झाल्या.

Photo Credit - Twitter

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या T20 सामन्यात प्रथम फलंदाजी (IND vs SA) करताना केएल राहुल आणि सूर्यकुमार यांच्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने 20 षटकात 3 गडी गमावून 237 धावा केल्या. नाणेफेक हारल्यानंतर फलंदाजीचा निर्णय घेत भारतीय संघाच्या सलामीवीरांनी चांगली सुरुवात केली. रोहित आणि राहुल यांच्यात पहिल्या विकेटसाठी 59 चेंडूत 96 धावा झाल्या. रोहित 37 चेंडूत 43 धावा करून बाद झाला. त्याचवेळी केएल राहुलने 28 चेंडूत 57 धावांची खेळी केली. त्याने आपल्या खेळीत 5 चौकार आणि 4 षटकार मारले. रोहित आणि राहुल बाद झाल्यानंतर सूर्यकुमारने कोहलीसोबत झटपट खेळी केली. त्याने 18 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. सूर्या 22 चेंडूत 61 धावा करून धावबाद झाला. त्याने आपल्या खेळीत 5 चौकार आणि 5 षटकार मारले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now