IND vs SA 3rd T20I: दक्षिण आफ्रिकेचा 49 धावांनी शानदार विजय, भारताने मालिका 2-1 ने जिंकली

भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दक्षिण आफ्रिकेने निर्धारित 20 षटकांत 3 गडी गमावून 227 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतीय संघाला निर्धारित 18.3 षटकांत केवळ 178 धावाच करता आल्या.

Photo Credit - Twitter

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका तिसरा T20 आंतरराष्ट्रीय सामना (India vs South Africa 3rd T20I) मंगळवारी इंदूरच्या होळकर क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारताचा 49 धावांनी पराभव केला. या पराभवानंतरही टीम इंडियाने मालिका 2-1 अशी जिंकली आहे. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दक्षिण आफ्रिकेने निर्धारित 20 षटकांत 3 गडी गमावून 227 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतीय संघाला निर्धारित 18.3 षटकांत केवळ 178 धावाच करता आल्या. भारताकडून दिनेश कार्तिकने 46, दीपक चहरने 31 आणि ऋषभ पंतने 27 धावा केल्या.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement