IND vs SA 3rd T20: टीम इंडियाने 'करा या मरो' सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 48 धावांनी केला पराभव, युझवेंद्र चहल-हर्षल पटेल यांनी केली शानदार गोलंदाजी

5 T20 सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना आज विशाखापट्टणम येथील डॉ वायएस राजशेखर रेड्डी ACA VDCA क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला. तत्पूर्वी, दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बावुमाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने निर्धारित 20 षटकांत 5 गडी गमावून 179 धावा केल्या.

टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळल्या गेलेल्या तिसर्‍या टी-20 सामन्यात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा 48 धावांनी पराभव केला आणि मालिकेत कायम राहिली. 5T20 सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना आज विशाखापट्टणम येथील डॉ वायएस राजशेखर रेड्डी ACA VDCA क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला. तत्पूर्वी, दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बावुमाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने निर्धारित 20 षटकांत 5 गडी गमावून 179 धावा केल्या. टीम इंडियासाठी सलामीवीर ऋतुराज गायकवाडने सर्वाधिक 57 धावांची खेळी खेळली. दक्षिण आफ्रिकेकडून ड्वेन प्रिटोरियसने दोन बळी घेतले. लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा संपूर्ण संघ 19.1 षटकांत 131 धावांवर गारद झाला. दक्षिण आफ्रिकेकडून हेनरिक क्लासेनने सर्वाधिक 29 धावा केल्या. टीम इंडियाकडून हर्षल पटेलने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा टी-20 सामना 17 जून रोजी राजकोटमध्ये खेळवला जाणार आहे.

Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement