शिवभक्तांनी पावसाळ्यामध्ये गड पायी चढणे टाळावे, संभाजीराजे यांचे आवाहन

कोविडच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांसाठी बंद असणारा दुर्गराज रायगड नुकताच रायगड जिल्हा प्रशासनाने सुरू केलेला आहे. मात्र रायगडावर पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे गडचढणीच्या मार्गावर मोठमोठे दगड कोसळत आहेत.

शिवभक्तांनी पावसाळ्यामध्ये गड पायी चढणे टाळावे, संभाजीराजे यांचे आवाहन
Sambhajiraje Chhatrapati | (Photo Credits: Facebook)

कोविडच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांसाठी बंद असणारा दुर्गराज रायगड नुकताच रायगड जिल्हा प्रशासनाने सुरू केलेला आहे. मात्र रायगडावर पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे गडचढणीच्या मार्गावर मोठमोठे दगड कोसळतात. तसेच पाण्याचा तीव्र प्रवाह पायरी मार्गावरून वाहत असतो. अशा परिस्थितीत गड पायी चढणे अत्यंत धोकादायक होऊ शकते. हे दगड हटविण्याचे काम प्राधिकरणाच्या वतीने सुरूच आहे. तथापि, सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून शिवभक्तांनी पावसाळ्यामध्ये गड पायी चढणे टाळावे, असे आवाहन संभाजी राजे यांनी केले आहे. फेसबूक पोस्ट-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Advertisement


Advertisement
Advertisement
Share Us
Advertisement