Mumbai Water Stock: मुंबईकरांची पाण्याची चिंता वाढली; धरणांमध्ये 27% पाणीसाठा शिल्लक
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांध्ये अत्यंत कमी पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्यावर्षी 33.90 टक्के पाणीसाठा शिल्लक होता. तो यंदा 27 टक्क्यांवर आला आहे.
Mumbai Water Stock : मुंबईकरांना पाण्याची काटकसर करावी लागणार आहे. कारण, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये फक्त 27 टक्के पाणीसाठी शिल्लक (Mumbai Water Crisis) राहिला आहे. हा पाणीसाठा मुंबईकरांना जून अखेरपर्यंत पुरवावा लागणार आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या उर्ध्व वैतरणा, मोडकसागर, तानसा, विहार, तुळशी, मध्य वैतरणा, भातसा या सात धरणांत पाणीसाठा 27 टक्क्यांपर्यंत आला आहे. उर्ध्व वैतरणा धरणात 36.60 टक्के, तुळशीमध्ये 44.20 टक्के, मध्य वैतरणामध्ये 12.13 टक्के, मोडकसागरमध्ये 24.97 टक्के, भातसामध्ये 26.34 टक्के, तानसामध्ये ४१.८६ टक्के, विहारमध्ये 39.61 साठयाची नोंद झाली आहे. (हेही वाचा :Mumbai Water Cut: मुंबईत 10 टक्के पाणीकपात लागू करण्याचा प्रस्ताव, पाणी जपून वापरण्याचे आवाहन )
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Lake Water Level: मुंबईवर पाणीटंचाईचे संकट? शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांची पातळी 18% पेक्षा कमी; 60 दिवसांचा साठा शिल्लक
Acute Food Insecurity in Pakistan: पाकिस्तानमधील 1.1 कोटी लोकांना बसू शकतो तीव्र अन्न असुरक्षिततेचा फटका- FAO Report
AAP Delhi Resignation: अरविंद केजरीवाल यांना धक्का, आपच्या 13 नगरसेवकांचे राजीनामे; इंद्रप्रस्थ विकास पक्षाची स्थापना
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
Advertisement
Advertisement
Advertisement