Maharashtra Restaurants & Shops Timing: राज्यातील रेस्टॉरंट्स आता मध्यरात्री 12 पर्यंत चालू, तर दुकाने रात्री 11 वाजेपर्यंत सुरु राहू शकतात; राज्य सरकारचा मोठा निर्णय

कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत असल्याने राज्यातील उपाहारगृहे, दुकानांच्या वेळा वाढविण्यासंदर्भात टास्क फोर्सच्या बैठकीत विचारविनिमय करण्यात आला होता

CM Uddhav Thackeray (Photo Credits: ANI)

कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत असल्याने राज्यातील उपाहारगृहे, दुकानांच्या वेळा वाढविण्यासंदर्भात टास्क फोर्सच्या बैठकीत विचारविनिमय करण्यात आला होता. तसेच अम्युझमेंट पार्कमधील मोकळ्या जागेत कोरड्या राईड्ससाठी परवानगी देण्याचे ठरले आहे. उपाहारगृहे व दुकाने यांच्या देखील वेळा वाढवून देण्याची सातत्याने मागणी होत आहे. त्यामुळे त्यांच्या वेळा वाढविण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना तयार करण्याचे निर्देश देण्यात आले होते. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे की, रेस्टॉरंट्स आणि भोजनालये मध्यरात्री 12 पर्यंत खुली राहू शकतात, तर दुकाने आणि आस्थापने रात्री 11 वाजेपर्यंत खुले राहू शकतात.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement