Maharashtra Political Crisis: महाविकास आघाडी मधून शिवसेना बाहेर पडण्यास तयार; संजय राऊतांचं बंडखोर आमदारांना 'हे' आवाहन

बंडखोर आमदारांनी गुवाहाटी मध्ये बसून नव्हे तर मुंबईत येऊन बोलावे आपण मार्ग काढू 24 तासांत परत या असं आवाहन संजय राऊत यांनी केले आहे.

Sanjay Raut | (Photo Credits: Facebook)

महाविकास आघाडीमधून शिवसेना बाहेर पडण्यास तयार आहे. बंडखोर आमदारांनी 24 तासांत परत या आपण बोलू असं जाहीर आवाहन संजय राऊत यांनी केले आहे. दरम्यान वर्षा बाहेर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही मोठी घोषणा केली आहे. आमदारांनी गुवाहाटी मधून कोणत्याही माध्यमातून बोलू नये आपण मुंबई मध्ये बसून बोलू असं म्हटलं आहे. संजय राऊतांचं हे आवाहन मागील काही दिवसांपासून राज्यात सुरू असलेल्या राजकीय घडामोडींमधील मोठं वळण ठरू शकतं.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement