Raigad Video: गावात स्माशानभूमीची व्यवस्था नसल्याने पूराच्या पाण्यातून नागरिकांचा जीवघेणा प्रवास
परिसरात स्मशानभूमी नदीच्या दुसऱ्या काठावर असल्याने अंतिम संस्कार करताना नदी ओलांडून दुसऱ्या काठावर जावे लागत आहे.
Raigad Video: खालापूर तालुक्यातील आरकत वाडी आणि परिसरातील आदिवसी पाड्यांवर सोयीसुविधांचा अभाव असल्याने नागरिकांना काही कठीण गोष्टीचा सामाना करावा लागत आहे. परिसरात स्मशानभूमी नदीच्या दुसऱ्या काठावर असल्याने अंतिम संस्कार करताना नदी ओलांडून दुसऱ्या काठावर जावे लागत आहे. यासंदर्भात खासदार सुप्रिया सुळा यांनी मन सुन्न करणाऱ्या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी रायगड प्रशासनला सकारात्मक कार्यवाही करण्यासाठी विनंती केली आहे. स्मशानभूमीची योग्य व्यवस्था केल्यास नागरिकांनी जीवाशी खेळ करावा लागणार नाही असं ही या पोस्टमध्ये लिहले आहे. रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस असल्याने ठिकठिकाणी पूर परिस्थिती झाली आहे. पूर ओलांडून नागरिकांनी जीवा प्रवास केल्याचे व्हिडिओत दिसत आहे. (हेही वाचा-ताम्हिणी घाट 5 ऑगस्ट पर्यंत वाहतूकीसाठी बंद)