Rahul Gandhi On Bypoll Elections Result: "भय आणि संभ्रमाचे जाळे फुटल्याचे स्पष्ट..." पोटनिवडणुकांच्या निकालानंतर राहुल गांधींची प्रतिक्रीया
सात राज्यातील 13 विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत (Bypoll Election Results) इंडिया आघाडीच्या दहा जागा आल्या आहेत. तर, केवळ दोन जागेवर भाजपाने विजय मिळवला आहे.
सात राज्यातील 13 विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत (Bypoll Election Results) इंडिया आघाडीच्या दहा जागा आल्या आहेत. तर, केवळ दोन जागेवर भाजपाने विजय मिळवला आहे. एका जागेवर अपक्ष उमेदवार निवडून आला. यावरून काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी एनडीए सरकारवर टीका केली आहे. “सात राज्यांमध्ये झालेल्या पोटनिवडणुकांच्या निकालांमुळे भाजपाने विणलेले ‘भय आणि संभ्रमाचे’ जाळे फुटल्याचे स्पष्ट झाले आहे. शेतकरी, तरुण, मजूर, व्यापारी, नोकरदार अशा प्रत्येक वर्गाला हुकूमशाही पूर्णपणे नष्ट करून न्यायाचे राज्य प्रस्थापित करायचे आहे. लोक आता त्यांचे जीवन सुधारण्यासाठी आणि संविधानाच्या रक्षणासाठी पूर्णपणे इंडिया आघाडीबरोबर उभे आहेत. जय हिंदुस्थान, जय संविधान”, असं ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे.
पाहा पोस्ट -