Indus Water Treaty Suspension: 'भारताचे पाणी केवळ देशाच्या हितासाठीच वाहणार, इथेच राहणार आणि कामी येणार'; PM Narendra Modi यांचे पाकिस्तानला सडेतोड उत्तर (Video)

सिंधू जल करार हा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सहा नद्यांच्या पाणीवाटपाचे नियमन करणारा महत्त्वाचा करार आहे. करार स्थगित केल्यानंतर भारताने जम्मू-काश्मीरमधील सलाल आणि बगलिहार जलविद्युत प्रकल्पांमध्ये जलाशयांची साठवण क्षमता वाढवण्यास सुरुवात केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार संपुष्टात आणला आहे. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रथमच सार्वजनिक विधान केले आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले, भारताचे पाणी पूर्वी बाहेर जात असे, आता ते भारताच्या हितासाठी राहील आणि देशासाठी उपयुक्त ठरेल. म्हणजेच, जे पाणी पूर्वी भारताच्या सीमेबाहेर वाहत होते, ते पाणी आता भारत सरकार थांबवून देशाच्या हितासाठी वापरण्याची योजना आखत आहे. पंतप्रधानांनी आपल्या भाषणात पाकिस्तानचे नाव घेतले नसले तरी, तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी घोषणाबाजी सुरू केली. यावर पंतप्रधान मोदी म्हणाले की, ‘तुम्हाला खूप लवकर समजले’, यावरून स्पष्ट होते की, पीएम मोदींचे पाकिस्तानला हे सडेतोड उत्तर आहे.

22 एप्रिल 2025 रोजी झालेल्या या हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला होता, ज्यामुळे भारताने 24 एप्रिल रोजी 1960 चा सिंधू जल करार करार स्थगित करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. सिंधू जल करार हा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सहा नद्यांच्या पाणीवाटपाचे नियमन करणारा महत्त्वाचा करार आहे. करार स्थगित केल्यानंतर भारताने जम्मू-काश्मीरमधील सलाल आणि बगलिहार जलविद्युत प्रकल्पांमध्ये जलाशयांची साठवण क्षमता वाढवण्यास सुरुवात केली आहे. याशिवाय, चिनाब नदीवरील बगलिहार धरणातून पाण्याचा प्रवाह तात्पुरता थांबवण्यात आला. भारताने धरणांमधील गाळ काढण्यासाठी पाण्याचा प्रवाह सोडला, जो सामान्यतः ऑगस्टमध्ये केला जातो, परंतु यावेळी मे महिन्यातच ही प्रक्रिया केली गेली. यामुळे पाकिस्तानच्या शेती आणि पिण्याच्या पाण्यावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे, कारण सिंधू नदी प्रणालीवर पाकिस्तानची 80 टक्के शेती अवलंबून आहे.

Indus Water Treaty Suspension:

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement