Assam Boat Tragedy: 120 प्रवासी घेऊन जाणाऱ्या दोन बोटी ब्रह्मपुत्रा नदीत एकमेकांना धडकल्या; 70 लोक बेपत्ता, एकाचा मृत्यू
आसामच्या जोरहाटमध्ये बुधवारी संध्याकाळी मोठा अपघात झाला आहे. येथे 120 प्रवासी घेऊन जाणाऱ्या दोन बोटी ब्रह्मपुत्रा नदीत एकमेकांना धडकल्या आहेत
आसामच्या जोरहाटमध्ये बुधवारी संध्याकाळी मोठा अपघात झाला आहे. येथे 120 प्रवासी घेऊन जाणाऱ्या दोन बोटी ब्रह्मपुत्रा नदीत एकमेकांना धडकल्या आहेत. अपघातानंतर सुमारे 70 लोक बेपत्ता आहेत, ज्यांचा शोध सुरू आहे. 50 लोकांना बाहेर काढण्यात यश आले आहे. यामध्ये आतापर्यंत एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची पुष्टी करण्यात आली आहे.
दोन्ही बोटी वेगवेगळ्या दिशांनी येत होत्या. एक बोट जोरहाटमधील निमटीघाटहून माजुलीकडे जात होती, तर दुसरी माजुलीहून जोरहाटकडे जात होती. बोटींमध्ये 25-30 बाईकही ठेवण्यात आल्या होत्या. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या टीमकडून बचाव मोहीम चालू आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनीही या भीषण बोट दुर्घटनेबद्दल दु: ख व्यक्त केले आहे.
दोन बोटी ब्रह्मपुत्रा नदीत एकमेकांना धडकल्या-