Lok Sabha Elections 2024: वंचित बहुजन आघाडी MVA सोबत युती करण्याची शक्यता नाही, काँग्रेस आणि UBT शिवसेनेत सहकार्याचा अभाव; प्रकाश आंबेडकर यांचा दावा

यावेळी आंबेडकरांनी एमव्हीएच्या अंतर्गत संघर्षासाठी टीका केली. तसेच त्यातील घटक पक्षांमधील सहकार्याचा अभाव अधोरेखित केला. काँग्रेस आणि शिवसेना (यूबीटी) या दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी वापरलेली प्रतिकूल भाषा त्यांनी एकत्र काम करण्याऐवजी एकमेकांना लक्ष्य करण्यावर लक्ष केंद्रित करत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

Lok Sabha Elections 2024: वंचित बहुजन आघाडी MVA सोबत युती करण्याची शक्यता नाही, काँग्रेस आणि UBT शिवसेनेत सहकार्याचा अभाव; प्रकाश आंबेडकर यांचा दावा
Prakash Ambedkar (Photo Credit: X)

Lok Sabha Elections 2024: महाराष्ट्र विकास आघाडी (MVA) पासून वेगळे झालेले वंचित बहुजन आघाडी (VBA) प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी रविवारी सांगितलं की, त्यांचा पक्ष MVA सोबत युती करण्याचा विचार करणार नाही. व्हीबीए लोकसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढण्यासाठी सज्ज आहे. जागावाटपावरून काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात सुरू असलेल्या भांडणावरही यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी टीका केली.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी वंचित बहुजन आघाडीला पुन्हा महाविकास आघाडीत सामील होण्यासाठी आमंत्रण दिले. मात्र, प्रकाश आंबेडकरांनी ही ऑफर फेटाळून लावली. VBA ने लोकसभा निवडणुकीसाठी आपला प्रचार आधीच सुरू केला आहे. काँग्रेसची ऑफर नाकारल्यानंतर प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं की, आता खूप उशीर झाला आहे. आम्ही आमचा प्रवास सुरू केला आहे आणि लोकसभा निवडणुकीसाठी आम्ही आधीच मार्गक्रमण करत आहोत. (हेही वाचा - Prakash Ambedkar and Manoj Jarange Patil: प्रकाश आंबेडकर यांचे मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत ठरले, थेट उमेदवार यादीच केली जाहीर)

दरम्यान, यावेळी आंबेडकरांनी एमव्हीएच्या अंतर्गत संघर्षासाठी टीका केली. तसेच त्यातील घटक पक्षांमधील सहकार्याचा अभाव अधोरेखित केला. काँग्रेस आणि शिवसेना (यूबीटी) या दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी वापरलेली प्रतिकूल भाषा त्यांनी एकत्र काम करण्याऐवजी एकमेकांना लक्ष्य करण्यावर लक्ष केंद्रित करत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. आंबेडकरांनी पक्षातील निर्णायक नेतृत्वाच्या अभावामुळे परिस्थिती हाताळण्यात काँग्रेसच्या असमर्थतेबद्दल निराशा व्यक्त केली. (वाचा - Prakash Ambedkar: "पण आपल्यालाल लढावं लागणार..."; इंडिया आघाडीच्या व्यासपीठावरुन प्रकाश आंबेडकरांचा एल्गार)

याशिवाय, आंबेडकरांनी राज्यस्तरीय आघाडीच्या निवडणुकांवर होणाऱ्या परिणामाबाबत जिल्हास्तरीय काँग्रेस नेत्यांच्या चिंतांवर प्रकाश टाकला. सत्ताधारी आघाडीला तोंड देण्यासाठी हे नेते आता स्थानिक पातळीवर रणनीती आखत असल्याचे ते म्हणाले. त्यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वी अनेक नेते पक्षांतर करू शकतात, असा इशाराही आंबेडकर यांनी दिला.

तथापी, 19 एप्रिल ते 20 मे या कालावधीत 48 मतदारसंघांसाठी पाच टप्प्यांत होणाऱ्या आगामी सार्वत्रिक निवडणुकांसाठी सर्वचं पक्ष जोमाने प्रचार करत आहेत. सात टप्प्यांत होणाऱ्या देशव्यापी निवडणुका 19 एप्रिल रोजी सुरू होतील आणि 1 जून रोजी संपतील.

(The above story first appeared on LatestLY on Apr 08, 2024 01:01 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).