CM Devendra Fadnavis On Rahul Gandhi: 'याचा अर्थ राहुल गांधींनी बिहारमध्ये आपला पराभव स्वीकारला आहे...', महाराष्ट्र निवडणूक हेराफेरीच्या आरोपांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया

भाजपने राहुल गांधी यांच्या निवडणुकीत हेराफेरीच्या आरोपांना गांभीर्याने घेतले असून भाजपचे नेते सतत त्यांच्यावर हल्ला करत आहेत.

CM Devendra Fadnavis | फोटो सौजन्य -ANI

CM Devendra Fadnavis On Rahul Gandhi: काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी 2024 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत हेराफेरीच्या आरोपांवरून राजकारण तीव्र झाले आहे असून त्यांच्यावर सर्व बाजूंनी राजकीय हल्ले सुरू झाले आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी राहुल गांधींच्या आरोपांवर प्रत्युत्तर दिले आहे. याचा अर्थ राहुल गांधी यांनी बिहारमध्ये आपला पराभव स्वीकारला आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. भाजपने राहुल गांधी यांच्या निवडणुकीत हेराफेरीच्या आरोपांना गांभीर्याने घेतले असून भाजपचे नेते सतत त्यांच्यावर हल्ला करत आहेत. फडणवीस यांच्यापूर्वी केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनीही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एक लांब पोस्ट लिहिली आणि राहुल यांच्या आरोपांना चोख प्रत्युत्तर दिले. तथापी, केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनीही राहुल यांच्या विधानांवरून राहुल यांना कोंडीत पकडले आहे.

बिहार विधानसभा निवडणुकीवरील राहुल गांधींच्या ट्विटवर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलताना म्हटले की, 'याचा अर्थ असा की राहुल गांधींनी बिहारमध्ये आपला पराभव स्वीकारला आहे. जोपर्यंत लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि खासदार राहुल गांधी जमिनीवर उतरून वस्तुस्थिती समजून घेत नाहीत, तोपर्यंत त्यांचा पक्ष कधीही जिंकू शकत नाही. (वाचा - ECI on Rahul Gandhi's Maharashtra Poll Remarks: 'महाराष्ट्रातील निवडणुकीवर केलेले आरोप निराधार व राज्याचा अपमान करणारे'; राहुल गांधींच्या टिप्पणीवर Election Commission ची प्रतिक्रिया)

राहुल गांधींना जागे व्हावे लागेल - मुख्यमंत्री फडणवीस

राहुल गांधींना जागे व्हावे लागेल आणि वास्तव समजून घ्यावे लागेल. अन्यथा, ते असेच बकवास बोलत राहतील. राहुल गांधींना ते काय बोलत आहेत हे समजत नाही आणि लोकांना ते काय बोलत आहेत हे समजणार नाही, अशी खोचक टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

राहुल गांधींनी X वरील पोस्टमध्ये म्हटलं आहे की, 'निवडणूक चोरीचा संपूर्ण खेळ. 2024 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुका लोकशाहीला हेराफेरी करण्याचा एक ब्लूप्रिंट होता. हे कट कसे टप्प्याटप्प्याने रचले गेले हे मी माझ्या लेखात सविस्तरपणे सांगितले आहे. पहिला टप्पा - निवडणूक आयोगाची नियुक्ती करणाऱ्या पॅनलला ताब्यात घेणे, दुसरा - बनावट मतदार यादीत समाविष्ट करणे, तिसरा - मतदानाचा टक्का वाढलेला दाखवण्यात आला. चौथा - भाजपला जिथे जिंकायचे होते तिथे लक्ष्य करून बनावट मतदान करण्यात आले. पाचवा - पुरावे लपवण्यात आले.'

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement