Shivneri Buses: लवकरच बंद होणार ठाणे आणि बोरिवलीहून पुण्याला जाणाऱ्या शिवनेरी बसेस; जाणून घ्या काय आहे MSRTC ची नवी योजना
ठाणे आणि बोरिवलीहून पुण्याला जाणाऱ्या शिवनेरी बस आता दादर-पुणे या लोकप्रिय मार्गावर वळवण्यात येणार आहेत. सध्या दर 30 मिनिटांनी एक शिवनेरी बस दादरहून सुटते. मुंबई आणि पुणे दरम्यान दररोज सुमारे 25,000 प्रवासी प्रवास करतात आणि त्यापैकी किमान 5,000 MSRTC बस वापरतात.
सध्या ठाणे (Thane), बोरिवली (Borivali) आणि दादर (Dadar) येथून पुण्यासाठी सुटणाऱ्या शिवनेरी बसेस (Shivneri Buses) या प्रवाशांसाठी आरामदायी प्रवासाचा एक उत्तम पर्याय आहे. म्हणूनच या बसेसची लोकप्रियतादेखील वाढली आहे. परंतु ऑक्टोबरपासून ठाणे आणि बोरिवलीहून पुण्याकडे जाणाऱ्या शिवनेरी बसेस बंद होणार आहेत, त्या ऐवजी प्रवाशांसाठी कमी किमतीच्या मात्र आरामदायी शिवाई बसेस उपलब्ध असतील. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) या मार्गावरील प्रतिष्ठित शिवनेरी बसेसऐवजी इलेक्ट्रिक शिवाई बसेस नेण्याचा विचार करत आहे. दादर ते पुणे दरम्यान शिवनेरी बस सुरू राहणार आहेत.
MSRTC चे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी सांगितले की, त्यांनी 150 वातानुकूलित इलेक्ट्रिक बसेसची ऑर्डर दिली आहे आणि वितरणाचा पहिला टप्पा ऑक्टोबरमध्ये अपेक्षित आहे. त्यापैकी काही पुणे मार्गावर वापरण्याची योजना आहे. ठाणे ते स्वारगेट, ठाणे ते शिवाई नगर, बोरीवली ते स्वारगेट आणि बोरिवली ते शिवाई नगर या चार मार्गांवर शिवनेरीची मागणी कमी असल्याचे अधिकारी सांगतात.
भलेही शिवनेरी बसेसना प्रतिसाद कमी असला तरी, लोक कमी किमतीमध्ये आरामदायी प्रवासाच्या शोधात आहेत, म्हणूनच शिवाई बसेस हा त्यासाठी योग्य पर्याय ठरू शकतो. वरील चार मार्गांवर शिवाई बसेस सुरू होतील आणि एका तिकिटाची किंमत अंदाजे 350 ते 375 रुपये च्या दरम्यान असेल. सध्या, शिवनेरी बस प्रति प्रवासी 450 रुपये आकारते. (हेही वाचा: Mumbai: बेस्टची एक रुपयात प्रवास योजना 31 ऑगस्टपर्यंत वाढवली; मुंबईकरांच्या उदंड प्रतिसादानंतर प्रशासनाचा निर्णय)
1 जून रोजी पहिली शिवाई बस पुण्याहून अहमदनगरसाठी निघाली. या बसेस 12 मीटर लांब असून त्यांची आसन क्षमता 43 असून त्या सरासरी 80 किमी प्रति तासाच्या वेगाने धावतात. या बसमध्ये प्रत्येक प्रवाशासाठी रिक्लाईनिंग सीट्स आणि बिल्ट-इन यूएसबी चार्जिंग पॉइंट आहेत. या बसेस सुरळीत प्रवासासाठी रीजनरेटिव्ह ब्रेकिंग सिस्टमसह तांत्रिकदृष्ट्या प्रगत आहेत. शिवाई बस केवळ शून्य उत्सर्जनच नव्हे तर शून्य आवाजाचेही पालन करतात, या बसेस जीपीएस उपकरणे, दिव्यांग प्रवाशांसाठी रॅम्प, सीसीटीव्ही कॅमेरे आणि पॅनिक बटणाने सुसज्ज आहेत.
दरम्यान, ठाणे आणि बोरिवलीहून पुण्याला जाणाऱ्या शिवनेरी बस आता दादर-पुणे या लोकप्रिय मार्गावर वळवण्यात येणार आहेत. सध्या दर 30 मिनिटांनी एक शिवनेरी बस दादरहून सुटते. मुंबई आणि पुणे दरम्यान दररोज सुमारे 25,000 प्रवासी प्रवास करतात आणि त्यापैकी किमान 5,000 MSRTC बस वापरतात.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)