'पेडर रोड'चे नाव बदलून 'भारतरत्न लता मंगेशकर रोड' ठेवावे; मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी

भाजप आमदार राम कदम यांनीही मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून लतादीदींचे स्मारक उभारण्याची मागणी केली आहे. मात्र शिवसेना खासदार संजय राऊत यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली असून, या मुद्द्यावर राष्ट्रीय पातळीवर विचार करण्याची गरज असल्याचे म्हटले आहे

'पेडर रोड'चे नाव बदलून 'भारतरत्न लता मंगेशकर रोड' ठेवावे; मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी
Lata Mangeshkar (Photo Credit: Facebook)

संघर्ष एनजीओचे (Sangharsh NGO) अध्यक्ष पृथ्वीराज मस्के (Prithviraj Maske) यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून पेडर रोडचे (Peddar Road) नाव बदलून भारतरत्न लता मंगेशकर रोड (Bharat Ratna Lata Mangeshkar Road) असे केले आहे. लता मंगेशकर यांच्या आठवणी भावी पिढ्यांच्या मनात कायम राहाव्यात, हा नाव बदलाच्या प्रस्तावामागचा विचार असल्याचे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. पत्रात म्हटले आहे की, ‘लता मंगेशकर प्रभाकुंज, पेडर रोड येथे राहात होत्या, अशावेळी भारतातील भावी पिढ्यांनी त्यांच्या निवासस्थानाजवळून जाताना त्यांची आठवण ठेवावी असे आम्हाला वाटते.

म्हणूनच त्या जिथे राहत होत्या त्या पेडर रस्त्याचे नाव बदलून भारतरत्न लता मंगेशकर रोड असे करावे ही विनंती, असे पत्रात नमूद केले आहे. याआधी दादरमधील शिवाजी पार्क येथे लता मंगेशकर यांचे स्मारक उभारले जावे अशी मागणी होत होती. भारतरत्न लता मंगेशकर यांचे रविवारी (6 फेब्रुवारी) सकाळी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर सायंकाळी मुंबईतील शिवाजी पार्क येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

लता मंगेशकर यांच्या अनेक चाहत्यांनी आणि संगीत प्रेमींनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून लतादीदींचे अंत्यसंस्कार जिथे झाले त्या मुंबईच्या शिवाजी पार्कमध्ये लता मंगेशकरांचे स्मारक बांधले जावे, अशी मागणी केली आहे. मुंबईतील शिवाजी पार्कवर लतादीदींचे स्मारक उभारण्याची मागणी करणाऱ्यांमध्ये राजकारणातील लोकही सामील झाले आहेत.

भाजप आमदार राम कदम यांनीही मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून लतादीदींचे स्मारक उभारण्याची मागणी केली आहे. मात्र शिवसेना खासदार संजय राऊत यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली असून, या मुद्द्यावर राष्ट्रीय पातळीवर विचार करण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. लताजी या राजकारणी नाहीत. त्यांच्या स्मरणार्थ स्मारक उभारण्याची गरज नाही. (हेही वाचा: लता मंगेशकर यांच्या स्मरणार्थ केंद्र सरकारने टपाल तिकीट काढण्याचा घेतला निर्णय)

याप्रकरणी प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांनी महाविकास आघाडी सरकारमधील त्यांचा मित्रपक्ष शिवसेनेऐवजी भाजपशी हातमिळवणी केली आहे. दादरच्या शिवाजी पार्कमध्येच लतादीदींचे स्मारक उभारावे, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे.

(The above story first appeared on LatestLY on Feb 09, 2022 06:19 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).