Maharashtra Local Body Elections: महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका भाजप महायुतीमध्येच लढणार- देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येत्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महायुतीच्या सहभागाची पुष्टी केली आहे. त्यामुळे आगामी काळातील राज्यात 29 महानगरपालिकां भाजप मित्रपक्षांसोबत मिळून लढेल हे आता स्पष्ट झाले आहे.

Devendra Fadnavis | (Photo Credit- ANI)

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतील (Maharashtra Local Body Elections) युतीबाबतचा निर्णय राज्य पक्ष नेतृत्वावर अवलंबून असेल, असे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी बुधवारी (11 जून) म्हटले आहे. त्यांनी पुष्टी केली की भारतीय जनता पक्ष (भाजप) शक्य असेल तेथे महायुती आघाडीअंतर्गत निवडणुका लढवण्याचे उद्दिष्ट ठेवतो. उर्वरीत ठिकाणी तत्कालीन परिस्थिती पाहूननिर्णय घेतला जाईल. ते म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी युती करण्याचा निर्णय घेण्याचे आमचे राज्याध्यक्ष, कार्यकारी अध्यक्ष आणि निवडणूक समितीला अधिकार आहेत. महायुतीच्या बॅनरखाली निवडणूक लढवण्याची आमची भूमिका आहे. ज्या ठिकाणी हे शक्य नाही, तिथे आम्ही मैत्रीपूर्ण लढत करू शकतो. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

महाराष्ट्र सरकारने 29 महानगरपालिकांमध्ये वॉर्ड सीमांकनाची प्रक्रिया सुरू केली आहे, ज्यामुळे दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या नागरी निवडणुकांची तयारी सुरू झाल्याचे संकेत मिळत आहेत. पुणे, नागपूर, ठाणे, नाशिक, पिंपरी-चिंचवड, नवी मुंबई, वसई-विरार, छत्रपती संभाजीनगर आणि कल्याण-डोंबिवली या प्रमुख शहरांचा या प्रक्रियेत समावेश आहे. (हेही वाचा, NCP 26th Anniversary: शरद पवार यांच्या पक्षात खांदेपालट? जयंत पाटील यांचे प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याचे संकेत)

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भाजप महायुतीसोबत

सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाला चार आठवड्यांच्या आत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी अधिसूचना जारी करण्याचे निर्देश अलिकडेच दिले होते. न्यायमूर्ती सूर्यकांत आणि एन. कोटीश्वर सिंह यांच्या खंडपीठाने निवडणूक आयोगाला नियमित तळागाळातील निवडणुकांच्या लोकशाही आदेशाचे समर्थन करण्याची गरज अधोरेखित करून चार महिन्यांत निवडणुका पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यास सांगितले आहे. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेस वेग आला आहे.

वॉर्ड-स्तरीय पुनर्रचना सुरू असताना आणि निवडणुकीच्या वेळापत्रकाकडे पाहता, राज्यात राजकीय हालचालींना वेग येत आहे. महाराष्ट्र महत्त्वाच्या स्थानिक निवडणुकांसाठी सज्ज होत असताना आता सर्वांचे लक्ष राज्य निवडणूक आयोग आणि महायुतीच्या रणनीतीवर आहे.

मुंब्रा घटनेबाबत रेल्वेमंत्र्यांशी चर्चा

दरम्यान, 9 जून रोजी चार जणांचा बळी घेणाऱ्या रेल्वे अपघातावर भाष्य करताना फडणवीस यांनी खुलासा केला की, त्यांनी त्याच दिवशी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी सखोल चर्चा केली होती. चांगले निर्णय घेण्यात आले आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement