Traffic Fines Increased: महाराष्ट्र सरकारने वाहतूक गुन्ह्यांसाठी वाढवला दंड, आता नियम तोडल्यास इतकी किंमत मोजावी लागणार
प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-Facebook)

महाराष्ट्र सरकारने (Government of Maharashtra) गुरुवारी मोटार वाहन कायदा (Motor Vehicle Act), 2019 अधिसूचित केला आहे. विविध वाहतूक गुन्ह्यांसाठी (Traffic offenses) चक्रवाढ दंड (Penalty) वाढवला आहे. ही अधिसूचना 1 डिसेंबरपासून लागू झाली आहे. पार्किंगच्या नियमांचे (Parking rules) उल्लंघन करणे, प्रदूषण नियंत्रणाखाली प्रमाणपत्र नसणे, कागदपत्रे सादर न करणे, काचेवर गडद फिल्म किंवा जाहिराती न लावणे, सिग्नल जंप करणे आणि सीट बेल्ट न लावणे यासाठी आता 500 रुपये दंड भरावा लागेल. दुसऱ्या आणि सलग गुन्ह्यांसाठी 1,500 रुपये द्यावे लागतील. यापूर्वी प्रत्येक गुन्ह्यासाठी 200 रुपये मोजावे लागत होते. शिवाय परवान्याशिवाय वाहन चालवल्यास दंडाची रक्कम 500 रुपयांवरून 5000 रुपये करण्यात आली आहे.

नवीन तरतुदीनुसार, कायद्यांतर्गत नियमांचे उल्लंघन करणारी वाहने विकण्याची किंवा डिलिव्हरीची ऑफर देणाऱ्या वाहनांचा डीलर, आयातदार किंवा उत्पादक यांना 1 लाख रुपयांचा दंड भरावा लागेल. यामध्ये जो कोणी वाहनाचा कोणताही भाग विकतो किंवा त्याची विक्री करण्यास परवानगी देतो त्याचा समावेश आहे. ज्याला त्याचे महत्त्वपूर्ण सुरक्षा घटक म्हणून सूचित केले गेले आहे. हेही वाचा Omicron Variant: महाराष्ट्रात सुमारे 28 नमुने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवले प्रयोगशाळेत, आरोग्य विभागाची माहिती

सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, दुचाकीस्वार दोघेही हेल्मेटशिवाय आणि आसन क्षमतेपेक्षा जास्त लोक पकडले गेल्यास दुचाकीस्वाराचा ड्रायव्हिंग लायसन्स तीन महिन्यांसाठी अपात्र ठरवला जाईल. रस्ता सुरक्षा, ध्वनी नियंत्रण आणि वायू प्रदूषण यांच्या संदर्भात विहित केलेल्या मानकांचे उल्लंघन करून सार्वजनिक ठिकाणी एखादी व्यक्तीने वाहन चालविल्यास परवाना देखील अपात्र ठरविला जाईल. यासाठी दंडाची रक्कमही वाढली आहे.

सार्वजनिक ठिकाणी शर्यतीचा दंड पहिल्या गुन्ह्यासाठी 2,000 रुपयांवरून 5,000 रुपये आणि प्रत्येक दुसऱ्या सलग गुन्ह्यासाठी 10,000 रुपये करण्यात आला आहे.  अनधिकृत व्यक्तीला वाहन चालविण्यास परवानगी दिल्यास मालकास 5,000 रुपये दंड आकारला जाईल. हे आधी 500 रुपये होते. विम्याशिवाय वाहन चालवल्यास पहिल्या गुन्ह्यासाठी 300 रुपयांवरून 2,000 रुपये आणि दुसऱ्या आणि सलग गुन्ह्यासाठी 4,000 रुपये दंड करण्यात आला आहे.

विविध गुन्ह्यांसाठी नवीन चक्रवाढ दंड 1 डिसेंबरपासून लागू होत असताना, अंमलबजावणीसाठी एक किंवा दोन दिवस लागतील, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. अधिका-यांनी सांगितले की वाढ आणि दंडातील बदलांमुळे वाहनचालकांना वाहतूक नियमांचे उल्लंघन करण्यापासून परावृत्त होईल आणि रस्ते अपघात आणि मृत्यू कमी होण्यास मदत होईल.