महाविकास आघाडीच्या नेत्यांनी 162 सह्यांचं पत्र राज्यपालांना सादर करत मागितली सत्ता स्थापनेची संधी

महाविकास आघाडीच्या नेत्यांनी त्यांची भेट घेऊन 162 आमदारांच्या सहीचं पत्र राज्यापालांना सुपूर्त केलं आहे. दरम्यान यानंतर पत्रकार परिषदेमध्ये बोलताना भाजपाने स्थापन केललं सरकार हे बहुमतातील नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

Mahavikas Aaghadi | Photo Credits: Twiter

महाराष्ट्रात भाजपा नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)  यांच्या नेतृत्त्वाखाली स्थापन करण्यात आलेल्या सरकार विरूद्ध आता शिवसेना, भाजपा आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस या पक्षाने कंबर कसायला सुरूवात केली आहे. आज सकाळी दिल्लीहून राष्ट्रपती भगतसिंह कोश्यारी राज्यात परतले. त्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी त्यांची भेट घेऊन 162 आमदारांच्या सहीचं पत्र राज्यापालांना सुपूर्त केलं आहे. दरम्यान यानंतर पत्रकार परिषदेमध्ये बोलताना भाजपाने स्थापन केललं सरकार हे बहुमतातील नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. Maharashtra Government Formation Live News Updates: विश्वासदर्शक ठरावासाठी 7 डिसेंबर पर्यंत मुदत द्या; भाजपाची राज्यपालांकडे मागणी.

दरम्यान तातडीने विश्वासदर्शक ठराव घेतला जावा यासाठी मागणी करताना महाविकास आघाडीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. या सुनावणीमध्ये आजदेखील दोन्ही पक्षांकडून युक्तीवाद केला असून सर्वोच्च न्यायालयाचे खंडपीठ उद्या सकाळी 10.30 वाजता त्याचा निकाल देणार आहे.

पहा महाविकासआघाडीचं पत्र

दरम्यान महाराष्ट्रामध्ये सत्ता संघर्ष कायम असताना महाविकास आघाडीने 162 आमदारांचे पत्र सादर करत सत्तास्थापनेची संधी द्या अशी मागणी देखील केली आहे. तर भाजपाकडून विश्वासदर्शक ठराव मंजूर करण्यासाठी 7 डिसेंबर पर्यंत मुदत मिळवी अशी मागणी देखील करण्यात आली आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now