Maharashtra Elections Results 2024: विधानसभा निकालापूर्वीच महाराष्ट्रात सुरु झाले रिसॉर्टचे राजकारण; महाविकास आघाडी आमदारांना 'सुरक्षित ठिकाणी' एअरलिफ्ट करणार- Reports

महाविकास आघाडीच्या अखंडतेचे रक्षण करण्यासाठी, काँग्रेसने सरकार स्थापनेची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत आपल्या विजयी उमेदवारांना कर्नाटक किंवा तेलंगणामधील सुरक्षित ठिकाणी हलवण्याची योजना आखली आहे.

Nana Patole (PC - ANI)

Maharashtra Elections Results 2024: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची सांगता आणि एक्झिट पोल जाहीर झाल्यानन्तर आता, विरोधी आघाडी महाविकास आघाडी सावधपणे वाटचाल करत आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांची आज मोठी बैठक झाली. पुढील आव्हानांचा अंदाज घेऊन, काँग्रेसने आपले विजयी उमेदवार सुरक्षित करण्यासाठी आणि संभाव्य पक्षांतर टाळण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यावर निवडून आलेल्या आमदारांशी संपर्क ठेवण्याची आणि गरज भासल्यास एअरलिफ्टद्वारे त्यांना इतरत्र हलवण्याची महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. भाजप आपल्या विजयी उमेदवारांना आपल्या बाजूने घेण्याचा प्रयत्न करू शकेल, या चिंतेतून पक्ष ही धोरणात्मक वाटचाल करणार आहे.

महाविकास आघाडीच्या अखंडतेचे रक्षण करण्यासाठी, काँग्रेसने सरकार स्थापनेची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत आपल्या विजयी उमेदवारांना कर्नाटक किंवा तेलंगणामधील सुरक्षित ठिकाणी हलवण्याची योजना आखली आहे. आपल्या आमदारांनी एकजूट राहावी आणि भाजपशी संपर्क टाळावा यासाठी पक्ष कोणतीही कसर सोडणार नाही.

अधिकृतपणे निकाल जाहीर होण्याआधीच, काँग्रेसने आपल्या उमेदवारांसाठी 'सुरक्षित जागा' ओळखल्या आहेत आणि आवश्यक असल्यास त्यांना सुरक्षित ठिकाणी विमानाने नेण्याची तयारी केली आहे. हे सावधगिरीचे पाऊल युतीच्या स्थिरतेला धोका निर्माण करणाऱ्या संभाव्य राजकीय डावपेचांना तोंड देण्यासाठी आहे. दुसरीकडे, शिवसेना (UBT) नेते संजय राऊत यांनी शुक्रवारी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला. एमव्हीएमधून सुमारे 160-165 आमदार निवडून येतील, असा दावा राऊत यांनी केला. (हेही वाचा: Prakash Ambedkar: प्रकाश आंबेडकर यांची VBA कोणाच्या बाजूने? सत्ताधारी की विरोधात? घ्या जाणून)

महाविकास आघाडीकडून मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्याच्या अंदाजावर प्रतिक्रिया देताना राऊत यांनी पुष्टी केली की, मुख्यमंत्री चेहरा निवडण्यासाठी अद्याप कोणताही फॉर्म्युला तयार करण्यात आलेला नाही कारण सर्वजण एकत्र बसून मुख्यमंत्री निवडतील. भाजपवर हल्ला करताना राऊत म्हणाले की, त्यांच्या आमदारांना ‘खोकावाला’ दबावापासून वाचवण्यासाठी त्यांनी आमदार म्हणून निवडून येणाऱ्या उमेदवारांसाठी हॉटेलची व्यवस्था केली आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now