'मी पुन्हा येईन हे जनतेला आवडले की नाही? याचा शोध घेईन' असे म्हणत भाजप नेते एकनाथ खडसे यांचा देवेंद्र फडणवीस यांना टोला
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापलेले दिसत आहे. राज्यावरील कोरोनाचे संकटावर मात करण्यासाठी राज्य सरकार योग्य निर्णय घेतल नसल्याचा आरोप वारंवार विरोधक करत आहेत. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी आपल्याच पक्षामधील नेत्याच्या कामगिरीवर नाराजी व्यक्त केली आहे.
“निव्वळ मी पुन्हा येणार, मी पुन्हा येणार, मी पुन्हा येणार ही गोष्ट जनतेला आवडली नाही का? कोणत्या कारणासाठी ? याचा शोध मी घेत आहे. मेहनत आणि कष्टाने आम्ही महाराष्ट्रात भाजपाचे एकट्याच्या बळावर सरकार आणले होते. त्या कालखंडात आत्ता आहेत त्यातील अनेक लोक नव्हतेसुद्धा. हे अलीकडे दहा बारा वर्षात जन्माला आलेले राजकारणात चमकायला लागले आहेत आणि आम्हाला अक्कल शिकवत आहेत”, असे एकनाथ खडसे हे आपल्या 68 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलत होते. हे देखील वाचा- Sardar Tara Singh Death Rumor: सरदार तारा सिंह यांच्या मृत्यूच्या बातम्या अफवा; अत्यावस्थ अवस्थेमधून लवकर बाहेर पडावेत यासाठी प्रार्थना करा: भाजपा नेते विनोद तावडे
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)