India-Pakistan Tensions: किनारपट्टीच्या रक्षणासाठी मच्छिमार बनणार महाराष्ट्र सरकारचे 'डोळे आणि कान'; ‘सुरक्षा निर्देश’ जारी

मच्छीमारांना राष्ट्रीय सुरक्षेचे 'डोळे आणि कान' बनण्यास सांगण्यात आले आहे, जेणेकरून 26/11 च्या मुंबई हल्ल्यासारख्या समुद्री मार्गाने होणाऱ्या दहशतवादी घुसखोरीला आळा घालता येईल. राज्य सरकार बहुतेक मासेमारी बोटींमध्ये ट्रान्सपॉन्डर बसवण्याचा प्रयत्न करत आहे जेणेकरून त्यांचे स्थान ट्रॅक करता येईल.

प्रतिकात्मक फोटो | (Photo Credits: Twitter/ ANI)

भारत आणि पाकिस्तानातील तणावाच्या (India-Pakistan Tensions) पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस आणि प्रशासकीय यंत्रणेकडून राज्यातील एकूणच सुरक्षा आणि सज्जतेचा आढावा घेतला होता. त्यानंतर आता माहिती मिळत आहे की, महाराष्ट्र सरकारने पालघर किनाऱ्याजवळ काम करणाऱ्या मच्छिमारांना (Fishermen) ‘सुरक्षा निर्देश’ जारी केले आहेत आणि त्यांना चालू असलेल्या भारत-पाक संघर्षाच्या पार्श्वभूमीवर देशाची सागरी सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी सतर्क राहण्यास सांगितले आहे. एका अधिकाऱ्याने याबाबत माहिती दिली. किनारी देखरेख वाढवण्याबाबत भारतीय नौदलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर हे निर्देश देण्यात आले आहेत, असे त्यांनी शुक्रवारी पीटीआयला सांगितले.

मच्छीमारांना राष्ट्रीय सुरक्षेचे 'डोळे आणि कान' बनण्यास सांगण्यात आले आहे, जेणेकरून 26/11 च्या मुंबई हल्ल्यासारख्या समुद्री मार्गाने होणाऱ्या दहशतवादी घुसखोरीला आळा घालता येईल. राज्य सरकार बहुतेक मासेमारी बोटींमध्ये ट्रान्सपॉन्डर बसवण्याचा प्रयत्न करत आहे जेणेकरून त्यांचे स्थान ट्रॅक करता येईल. नौदलाने मुंबईत मासेमारी करणाऱ्या बोटींचे सर्वेक्षण करण्याची योजना देखील जाहीर केली, ज्यामध्ये अॅपद्वारे डेटा गोळा केला जाईल. या तणावाच्या पार्श्वभूमीवर, भारतीय नौदलासोबत झालेल्या बैठकीमध्ये, संवेदनशील नौदलाच्या क्षेत्रात मासेमारी करू नये असा सल्ला मच्छिमारांना देण्यात आला.

मच्छीमारांना समुद्रात कोणतीही संशयास्पद बोट, विशेषतः परराज्यातील किंवा परदेशी बोटी, उपकरणे किंवा व्यक्ती दिसल्यास तात्काळ नौदल, तटरक्षक दल किंवा स्थानिक पोलिसांना कळवण्यास सांगितले आहे. यामध्ये अपरिचित बोटींचे स्थान, रंग, आकार आणि हालचालींचा तपशील देणे समाविष्ट आहे. हे निर्देश भारत-पाकिस्तान सीमेवरील वाढत्या तणावाच्या आणि 22 एप्रिल 2025 रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर देण्यात आले आहेत. (हेही वाचा: India-Pakistan War: भारतीय नौदलाकडून मासेमारी प्रतिबंधित क्षेत्र जाहीर; दिसताच क्षणी गोळ्या घालण्याचे आदेश)

पहलगाम हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला होता, आणि त्यामागे पाकिस्तान-प्रायोजित लष्कर-ए-तैयबाशी संबंधित ‘द रेझिस्टन्स फ्रंट’ गटाचा हात असल्याचा भारताचा दावा आहे. यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तान आणि पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर कारवाई केली, ज्यामुळे दोन्ही देशांमधील तणाव वाढला. पाकिस्तानने ड्रोन हल्ल्यांनी प्रत्युत्तर दिले, ज्यामुळे महाराष्ट्रासह सीमावर्ती राज्यांमध्ये सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. महाराष्ट्राच्या 720 किलोमीटर लांबीच्या किनारपट्टीवर 26/11 च्या मुंबई हल्ल्यासारख्या समुद्री घुसखोरीचा धोका कायम आहे. त्या हल्ल्यात दहशतवादी मच्छीमार बोटीचा वापर करून मुंबईत घुसले होते.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement