कोल्हापूर येथे भीषण अपघात; गाडी डोहात बुडून पाच ठार, दोन जखमी

कोल्हापूर – रत्नागिरी महामार्गावर रेडीडोह जवळ तवेरा गाडीचा टायर फुटून एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला असून, काही लोक जखमी झाले आहे

प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: ANI)

कोल्हापूर – रत्नागिरी महामार्गावर रेडीडोह जवळ तवेरा गाडीचा टायर फुटून एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला असून, काही लोक जखमी झाले आहे. मृतांमध्ये 4 महिलांचा समावेश असून, एकाच कुटुंबातील 3 महिलांनी या अपघातात आपला जीव गमावला आहे.

या गाडीतून प्रवास करणारे तांदळे कुटुंबीय रत्नागिरी आणि मार्लेश्वर येथे पर्यटनासाठी गेले होते. घरी परतत असताना कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा मार्गावरील जोतिबा फाटा येथे त्यांच्या कारला अपघात झाला. त्यांच्या तवेरा गाडीचा पाठीमागील टायर फुटल्याने चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि ही कार जवळच्या रेडे डोहात जाऊन कोसळली. डोहात गाडी बुडाल्याने यातील प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला. अपघातग्रस्त मोटारीतील अन्य काही प्रवासी बेपत्ता आहेत. त्यांची शोध मोहिम सुरु आहे.

अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी अपघातात ठार झालेल्या प्रवाश्यांचे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. तसंच अपघाताताील जखमींना उपचारासाठी तातडीने कोल्हापूरातील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात (सीपीआर) दाखल करण्यात आले आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now
Advertisement


संबंधित बातम्या

Xiaomi Black Friday Sale 2020 अंतर्गत स्मार्टफोन आणि अॅक्सेसरीज वर 10,000 रुपयांपर्यंत डिस्काऊंट; Amazon India वरुन करु शकता खरेदी

Pune Infant & Maternal Deaths: पुण्यात गेल्या 3 वर्षात 1,356 अर्भकांचा आणि 282 मातांचा मृत्यू; समोर अली धक्कादायक आकडेवारी

SSC HSC Exam: जुलै-ऑगस्टमध्ये होणाऱ्या दहावी-बारावीच्या परीक्षेसाठी खासगी विद्यार्थ्यांना नावनोंदणीसाठी संधी; राज्य मंडळाचा निर्णय

India's Got Latent Controversy: पुन्हा एकदा रणवीर अलाहाबादिया आणि अपूर्वा मुखिजा यांच्या अडचणीत वाढ; आता महाराष्ट्र सायबर पोलीस करू शकतात कारवाई, जाणून घ्या कारण

Advertisement

Metro Corridor Between Shivajinagar and Hinjewadi: शिवाजीनगर आणि हिंजवडी यांना जोडणारी पुणे मेट्रो लाईन-3 पूर्ण होण्यासाठी आणखी अवधी लागणार

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement