Devendra Fadnavis Statement: विकेंद्रीकरणावर भर देऊन तालुकास्तरीय गावांचा विकास करणार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे वक्तव्य
Devendra Fadnavis (Photo Credit - Twitter)

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या हस्ते काल यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान (Yashwantrao Chavan Foundation) येथे ‘सिटीझनविल’ (Citizenville) या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. अमेरिकेतील कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर गॅविन न्यूसम (Governor Gavin Newsom) यांच्या इंग्रजीतील पुस्तकाचा लेखक सत्यजीत तांबे (Satyajit Tambe) यांनी मराठीत अनुवाद केला आहे. प्रकाशन सोहळ्यात बोलताना उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की लोकांना काय हवे आहे याची गाथाच ‘सिटीझनविल’ या पुस्तकाद्वारे उलगडण्यात आली आहे. यापुढील काळात ‘इज ऑफ लिव्हिंग’ महत्त्वाचे ठरणार असल्याने योग्यवेळी विकेंद्रीकरणावर भर देऊन आता तालुकास्तरीय गावांचा विकास करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.

उपमुख्यमंत्री म्हणाले की शहरी पायाभूत सुविधांच्या विकासासाठी मुबलक निधी उपलब्ध करून देण्यात येत असून ‘ट्रान्स हार्बर’ सारख्या प्रकल्पांमुळे तिसरी मुंबई वेगाने साकारली जात आहे. गतिशक्ती योजनेत सुद्धा विविध विभागांचा डाटा विविध स्तरावर एकत्रित करण्यात येत आहे. ज्यामुळे अधिक चांगले नियोजन जास्त वेगानेही करता येईल. बदलत्या तंत्रज्ञानामुळे विविध क्षेत्रात मोठे बदल घडत आहेत. आज आपण डिजिटल क्रांतीच्या युगात आहोत. हेही वाचा Gujarat Election Results 2022: गुजरात विधानसभा निवडणुकीचे निकालांवर शरद पवारांनी दिली प्रतिक्रिया, वाचा नेमकं काय म्हणाले ?

त्यामुळे लोककल्याणासाठी तंत्रज्ञानाचा वापर अधिकाधिक वाढवण्याची आवश्यकता असून या तंत्रज्ञानाचा उपयोग शहरे अधिक विकसित करण्यासाठी केला पाहिजे. ‘स्पीड ऑफ डेटा’ आणि ‘स्पीड ऑफ ट्रॅव्हल’ यामुळेच यापुढील काळात अधिक वेगाने प्रगती करता येणे शक्य होणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. शहरीकरणाचे योग्य व्यवस्थापन आवश्यक जगाच्या आजपर्यंतच्या विकासात शहरीकरण व स्थलांतरे ही अटळ बाब ठरली.

मात्र ज्या देशांनी याचे योग्य व्यवस्थापन केले त्यांनी प्रगती केल्याचे आपण पाहतो.साठ टक्के सकल राष्ट्रीय उत्पादन (GDP) शहरांमधून निर्माण होतो, त्यामुळे शहरे बकाल होणार नाहीत याची काळजी घेतली पाहिजे. त्याचबरोबर शेतीला सुद्धा सेवा क्षेत्राशी जोडण्याची आवश्यकता आहे. असे उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. राजकारण व समाजकारण क्षेत्रातील सर्वानीच स्वतःला अद्ययावत ठेवले पाहिजे. विविध विषयांचा खोलवर अभ्यास केला पाहिजे.

लोकांना आपली मते मांडण्यासाठी ‘आपले सरकार’ हा प्लॅटफॉर्म तयार केला असून त्याला मोठा प्रतिसाद मिळत असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले. प्रकाशन सोहळ्यात पुस्तकाचे लेखक सत्यजित तांबे म्हणाले की ‘सिटीझनविल’ हे पुस्तक वाचल्यानंतर यातील संकल्पना आपल्या देशात आणि राज्यात कशा राबवता येतील याची इच्छा निर्माण झाली. हेही वाचा Mumbai: बृहन्मुंबई महानगरपालिका पुढील महिन्यात 135 वर्षे जुन्या मलबार हिल जलाशयाच्या पुनर्बांधणीला करणार सुरुवात

त्यामुळे शहरांचा विकास या संकल्पनेत आता अनेक पैलू समाविष्ट झाले आहेत. लोकसहभागातूनच यापुढील काळात विविध आव्हाने पेलता येणे शक्य होणार असल्याचे तांबे यांनी सांगितले. या सोहळ्याला आमदार बाळासाहेब थोरात, नॅशनल स्टॉक एक्सचेंजचे मुख्य कार्यकारी अधिकारी, आशीष चौहान, गौर गोपाल दास, क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे देखील उपस्थित होते.