Coronavirus Vaccination: लसीकरण केंद्रावर नागरिकांना लस निवडण्याचा पर्याय नाही; Covishield व Covaxin या दोन्ही लशी सारख्याच परिणामकारक- BMC

महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, लसीकरण केंद्रावर आपल्याला लस निवडण्याचा पर्याय उपलब्ध नसुन, सदर दोन्ही लसींच्याबाबत संभम न बाळगता लसीकरण केंद्रावर जी लस उपलब्ध असेल त्याचा लाभ घ्यावा.

Coronavirus Vaccine | Representational Image | (Photo credits: Flickr)

सध्या महाराष्ट्रात कोरोना विषाणूचा (Coronavirus) उद्रेक वाढत आहे. लोकांनी काळजी घेत नियम व निर्बंध पाळण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. दुसरीकडे राज्यात कोरोना लसीकरणावर भर दिला जात आहे. मुंबईमध्ये (Mumbai) नागरिकांकडून ठराविक लसीला प्राधान्य दिले जात असल्याचे लक्षात येत आहे, त्यामुळे बीएमसीने (BMC) कोविशिल्ड व कोव्हॅक्सीन या दोन्ही लशी सारख्याच परिणामकारक असल्याचे सांगितले आहे. तसेच नागरिकांना लस निवडण्याचा पर्याय नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. इकबाल सिंह चहल यांनी नागरिकांना याबाबत सांगितले आहे.

भारत सरकारच्या आदेशान्वये बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात दिनांक 16 जानेवारी, 2021 पासून 'कोविड19' लसीकरण मोहीम कार्यन्वित करण्यात आली आहे. या अंतर्गत लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात 'सिरम इन्स्टिटयुट ऑफ इंडीया' या कंपनीची कोविशिल्ड लस उपलब्ध करुन देण्यात आली. तर दिनांक 15 मार्च, 2021 पासुन 'भारत बायोटेक' या कंपनी निर्मित 'को-व्हॅक्सीन' ही लस वापरण्यासाठी भारत सरकारची मंजुरी प्राप्त झाली आहे. तसेच या व्यतिरिक्त इतर काही वेगळ्या लसी देखील भविष्यात उपलब्ध होणार आहेत. सध्या सदर दोन्ही प्रकारच्या लसी मुंबईसह देशात वापरण्यात येत असुन दोन्ही लसी परिणामकारक आहेत.

या अनुषंगाने महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, लसीकरण केंद्रावर आपल्याला लस निवडण्याचा पर्याय उपलब्ध नसुन, सदर दोन्ही लसींच्याबाबत संभम न बाळगता लसीकरण केंद्रावर जी लस उपलब्ध असेल त्याचा लाभ घ्यावा. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात 'कोविड 19' या आजाराचा प्रादुर्भाव काही प्रमाणात वाढत असून या दृष्टीने प्रतिबंधासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे व शासनाद्वारे विविध स्तरीय उपाययोजना नियमितपणे राबविण्यात येत आहेत. कोविड प्रतिबंधात्मक लस घेणे हा देखील याच उपाययोजनांचा एक भाग आहे. मात्र, लस घेतलेली असो किंवा अद्याप घ्यावयाची बाकी असो, या दोन्ही बाबत सर्वच नागरिकांनी कोविड प्रतिबंधासाठी संबंधित नियमांची परिपूर्ण व काटेकोरपणे अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. (हेही वाचा: राज्यातील वाढत्या रुग्णसंख्येवर लॉकडाऊन चा पर्याय? पहा काय म्हणाले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे)

यामध्ये दोन व्यक्तिंमध्ये सुरक्षित अंतर ठेवणे, मास्क लावणे, सॅनिटायझरचा उपयोग करणे किंवा वारंवार हात धुणे या बाबी अत्यंत महत्वाच्या आहेत. तसेच कोविड 19 या संसर्गजन्य आजारावर खात्रीशीर औषध नसल्यामुळे, ज्यांना कोविड बाधा झाली आहे, अशा व्यक्ती किंवा त्यांच्या निकटच्या संपर्कातील व्यक्ती यांचे विलगीकरण अलगीकरण करणे देखील गरजेचे आहे. यानिमित्ताने बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनातर्फे पुन्हा एकदा आवाहन करण्यात येत आहे की, नागरिकांनी कोविड विषयक सर्व नियमांचे अत्यंत काटेकोरपणे पालन करावे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now