'मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लवकरच शेतकरी कर्ज माफीचा दुसरा टप्पा जाहीर करतील' राज्यमंत्री बच्चू कडू यांची माहिती
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखालील महाविकासआघाडी (Maha Vikas Aghadi) सरकारने आपल्या कार्यकाळातील शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी (First List of Farmer's Loan Waiver) आज जाहिर केली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखालील महाविकासआघाडी (Maha Vikas Aghadi) सरकारने आपल्या कार्यकाळातील शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी (First List of Farmer's Loan Waiver) आज जाहिर केली आहे. यानंतर उद्धव ठाकरे लवकरच शेतकरी कर्जमाफीचा दुसरा टप्पा पार जाहीर करणार आहेत, अशी माहिती महाविकास आघाडीचे राज्यमंत्री बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांसाठी 2 टप्यात कर्जमाफी जाहिर केली होती. त्यातील पहिला टप्पा 2 लाखांच्या आत कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी होता. तसेच 20 ते 25 हजार शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळाला आहे. यानंतर 2 लाखांच्यावर कर्ज असणाऱ्या शेतकऱ्याचे कर्ज दुसऱ्या टप्प्यात माफ केले जाणार, अशी माहिती बच्चू कडू यांनी दिली आहे.
कर्जमाफीच्या पहिल्या यादीत प्रत्येक जिल्ह्यातील 2 गावांचा समावेश आहे. कर्जमाफीसाठी 83 हजार 908 खात्याची माहिती संकलित केली आहे. त्यापैकी एकूण 68 गावांतील शेतकऱ्यांची यादी जाहीर करण्यात आली असून, उर्वरीत शेतकऱ्यांच्या नावांची यादी टप्प्याटप्याने जाहीर केली आहे. कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी झाल्याचे प्रमाणपत्रही देण्यात येणार आहे. पहिल्या यादीत एकूण 68 गावातील 15 हजार 358 लाभार्थी शेतकऱ्यांचा समावेश आहे. कर्जमाफीची अंमलबजावणी करण्यासाठी सरकारने 43 लाख 83 हजार 908 खात्यांची माहिती संग्रहित केली होती. यातच महाविकास आघाडीचे नेते बच्चू कडू यांनी शेतकरी कर्जमाफीचा दुसरा टप्पा लवकरच जाहिर करण्यात येणार, अशी महिती दिली आहे. पहिल्या टप्प्यात 2 लाखांच्या आत कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांचा मोठा फायदा झाला असून लवकरच दुसरा टप्पाही जाहीर करण्यात येणार आहे, असे सांगितले जात आहे. हे देखील वाचा- सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांचे जातवैधता प्रमाणपत्र रद्द
विधीमडळाचा अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज पहिला असून कर्जमाफीच्या मुद्द्यावरून विरोधक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, विरोधकांनी कर्जमाफीच्या मुद्यावरून विधीमंडळाच्या पायऱ्यावर सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देत फलक झळकवली. यावेळी सरकार कर्जमाफीच्या मुद्द्यावरुन शेतकऱ्यांच्या फसवणुकीची मालिकाच रचत असल्याचा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवीस यांनी केला आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)