कोरेगाव-भीमा हिंसाचारासाठी मुख्यमंत्रीही जबाबदार, आयोगासमोर बोलावून त्यांचे जबाब नोंदवावेत : प्रकाश आंबेडकर

हिंसाचारासाठी मुख्यमंत्रीही जबाबदार आहेत, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आयोगासमोर बोलावून त्यांचे जबाब नोंदवावेत असे प्रकाश आंबेडकर यांचे म्हणणे आहे

प्रकाश आंबेडकर (Photo Credits: PTI)

भारिपचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज कोरेगाव भिमा चौकशी आयोगासमोर आपले प्रतिज्ञापत्र सादर केले. कोरेगाव भीमा हिंसाचारात संभाजी भिडे हेच सूत्रधार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंसाचारानंतर पोलिसांना दिलेल्या आदेशांची चौकशी आयोगाने माहिती मागवावी अशी मागणी प्रकाशजींनी केली आहे. या हिंसाचारासाठी मुख्यमंत्रीही जबाबदार आहेत, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आयोगासमोर बोलावून त्यांचे जबाब नोंदवावेत असे प्रकाश आंबेडकर यांचे म्हणणे आहे.

प्रकाश आंबेडकरांच्या मागणीवर आपले मत नोंंदावताना, आयोगाला वाटले आणि गरज पडल्यास मुख्यमंत्र्यांपासून कोणत्याही मंत्र्यांना चौकशीसाठी बोलावण्यात येईल. मात्र तुर्तास मुख्यमंत्र्यांना चौकशीसाठी बोलावणे योग्य ठरणार नसल्याचे मत भीमा कोरेगाव चौकशी आयोगाने मांडले आहे. हिंसाचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सचिव, गृहराज्यमंत्री, केंद्रीय गुप्तचर यंत्रणा, पालकमंत्री गिरीश बापट आणि पोलीस प्रशासन जबाबदार असून त्यांचे देखील जबाब घ्यावेत, अशी विनंती आंबेडकर यांनी चौकशी आयोगाला केली.

त्याचबरोबर कोल्हापूर परिक्षेत्राचे विश्वास नांगरे पाटील यांनी बिनसरकारी उच्च स्तरीय समिती स्थापन केली. त्या समितीमध्ये उपमहापौर सिध्दार्थ धेंडे होते. तरी याबाबत पुणे ग्रामीण आणि पुणे शहर पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात विरोधाभास असल्याचा दावा त्यांनी केला. याबाबत सध्या तरी आयोगांनी आपली भूमिका स्पष्टपणे मंडळी आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now
Advertisement


संबंधित बातम्या

Xiaomi Black Friday Sale 2020 अंतर्गत स्मार्टफोन आणि अॅक्सेसरीज वर 10,000 रुपयांपर्यंत डिस्काऊंट; Amazon India वरुन करु शकता खरेदी

Mumbai Mega Block Update: रविवारी मध्य रेल्वेकडून कल्याण ते ठाणे दरम्यान मेगाब्लॉकची घोषणा; देखभालीच्या कामासाठी घेण्यात येणार ब्लॉक

Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

Accident on Atal Setu: अटल सेतूवर भीषण अपघात; 180 किमी प्रतितास वेगाने SUV चालवणाऱ्या 28 वर्षीय तरुणाचा डंपरला धडकल्याने मृत्यू

Advertisement

Maharashtra Lottery Result: महाराष्ट्रलक्ष्मी, महा.गजलक्ष्मी शनि, गणेशलक्ष्मी समृद्धी, महा. सह्याद्री प्रभालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement