Suicide News: मुलाचा गावी जाण्याचा हट्ट पुर्ण न केल्याने उचलले टोकाचे पाऊल, तिसगावतील धक्कादायक घटना
छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली. आई वडिलांनी मुलाला गावी घेवून नाही गेले म्हणून राहत्या घरी आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.
Suicide News: छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. आई वडिलांनी मुलाला गावी घेवून नाही गेले म्हणून राहत्या घरी आत्महत्या (Suicide) केल्याची घटना उघडकीस आली आहे. काही कामानिमित्त आई- वडिल नांदेडला गेले. आणि या गावी जाणाचा हट्ट पुर्ण न केल्याने मुलाने हे टोकाचे पाऊल उचलले आहे. या घटनेमुळे परिसरात शोक व्यक्त केला आहे. छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील तिसगावच्या आदर्शनगरमधील म्हाडा कॉलनीमध्ये सायंकाळी साडेपाच वाजता ही घटना उघडकीस आली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, सौरभ मिसाळ असं मयत तरुणाचे नाव आहे. बारवीत शिक्षण घेत होता. दरम्यान त्याचे खासगी क्लासेस सुरु होते. त्यामुळे आई वडिलांनी त्याला घरीच सोडले. त्याला गावी जायचं होतं आई वडिलांसमोर त्यांने गावी जायचा अट्टाहास धरला. काही कामानिमित्त 11 ऑगस्ट रोजी नांदेडला सौरभचे आई वडिल आणि छोटी बहिण गावाला निघाले. सौरभ त्याच्या राहत्या घरी एकटा होता.त्याचा जेवणाची जबाबदारी मावशीला देण्यात आली होती.त्याची मावशी घराच्या शेजारी राहते. काल दुपारी बराच वेळ तो घराच्या बाहेर पडला नाही म्हणून मावशीने घराचा दरवाजा वाजवला.
दरवाजा बराच वेळ वाजवल्याने त्याने कोणताही प्रतिक्रिया दिली नाही. मावशीने घरातील खिडकीत पाहिले तर सौरभ हा लटकलेल्या अवस्थेत सापडला. त्याने गळफास घेवून आत्महत्या केल्याचे पोलीसांना सांगितले. पोलीसांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि पंचनामा केला. त्याच्या आई वडिलांना कळवण्यात आले. या घटनेमुळे परिसर हादरले आहे. सौरभच्या कुटूंबावर दुखाचे डोंगर कोसळले आहे.
(The above story first appeared on LatestLY on Aug 13, 2023 02:40 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

