Anil Parab on Ramdas Kadam: शिवसेना नेते रामदास कदम यांच्या आरोपांवर अनिल परब यांची मोजकी प्रतिक्रिया, 'पक्ष दखल घेईल'
रामदास कदम यांनी केलेल्या आरोपाविरुद्ध मी (Ramdas Kadam on Anil Parab) काहीही बोलणार नाही. ते शिवसेना नेते आहेत. मी एक सामान्य शिवसैनिक आहे. त्यामुळे त्यांचे आरोप आणि वक्तव्ये याबाबत जी काही दखल घ्यायची ती पक्षच घेईल. मी त्यावर काहीही बोलणार नाही, असे परब यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले आहे.
शिवसेना (Shiv Sena) नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी केलेल्या आरोपाला मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी अत्यंत मोजक्या शब्दात उत्तर दिले आहे. रामदास कदम यांनी केलेल्या आरोपाविरुद्ध मी (Ramdas Kadam on Anil Parab) काहीही बोलणार नाही. ते शिवसेना नेते आहेत. मी एक सामान्य शिवसैनिक आहे. त्यामुळे त्यांचे आरोप आणि वक्तव्ये याबाबत जी काही दखल घ्यायची ती पक्षच घेईल. मी त्यावर काहीही बोलणार नाही, असे परब यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले आहे. परब यांच्या प्रतिक्रियेबाबत एबीपी माझाने वृत्त दिले आहे. रामदास कदम यांनी आयोजित पत्रकार परिषदेत अनिल परब यांच्यावर तीव्र शब्दात टीका केली आहे. त्यामुळे अनिल परब यांच्याकडून काय प्रत्युत्तर येते याबाबत उत्सुकता होती. रामदास कदम हे शिवसेनेचे आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात. त्यामुळे शिवसेनेच्याच एका नेत्याने आपल्याच पक्षाच्या मंत्रीपदावर असलेल्या नेत्यावर आक्रमक शब्दात टीका करवी याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. रामदास कदम (Ramdas Kadam on Anil Parab) हे पाठीमागील काही दिवसांपासून नाराज असल्याची चर्चाही सुरु आहे.
काय म्हणाले होते रामदास कदम?
शिवसेना नेते रामदास कदम यांनी मंत्री अनिल परब च्यावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. अनिल परब हे शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाच्या घषात घालायला निघाले आहेत असा खळबळजनक आरोप करत 'शिवसेनेचा गद्दार मी नव्हे तर अनिल परब आहे' असेही म्हटले आहे. रामदास कदम यांनी पक्षातील नेत्याविरोधात बोलल्याने कारवाई केली तर तुमची भूमिका काय असेल असे पत्रकारांनी विचारले. यावर आपली भूमिक स्पष्ट करत म्हणाले की, मी कुठेच पक्षाच्या विरोधात बोललो नाही. मी केवळ अनिल परब यांच्यावर बोललो आहे. जर अनिल परब म्हणजेच पक्ष असेल तर आम्ही कायमचं घरी बसू. त्याला काही ईलाज नाही. अनिल परब म्हणजेच शिवसेना असे असेल आणि रामदास कदम यांचे शिवसेनेसाठी काहीच योगदान नसेल अशी भूमिका जर कोणी घेत असेल तर त्याला कोण काय करु शकतं? असे प्रश्नार्थक उद्गारही रामदास कदम यांनी या वेळी काढले. (हेही वाचा, Ramdas Kadam on Anil Parab: शिवसेना नेते रामदास कदम यांचे अनिल परब यांच्यावर जोरदार टीकास्त्र, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना लिहिलेले पत्रही व्हायरल)
जेव्हा मी संघर्ष करत होतो तेव्हा अनिल परब कोठे होता? हाच परब हा शिवसेनेचा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घशात घालायला निघाला आहे. त्यामुळे शिवसेनेचा गद्दार मी नव्हे अनिल परब आहे. जर घोषणाच द्यायच्या असतील तर अनिल परब याच्याविरोधात द्या, असेही रामदास कदम म्हणाले. मी भगव्या झेंड्याचा शिपाई आहे. कडवट शिवसैनिक आहे. मी कधीही स्वत:ला डाग लावून घेतला नाही. तुमची व्यक्तीगत मालमत्ता म्हणजे शिवसेनेची नव्हे. तुमच्या हॉटेलवर बोलणे म्हणजे शिवसेनेवर बोलणे नव्हे. अनिल परम म्हणजे शिवसेनेचे पक्षप्रमुख नाही. उगाच माझ्यावर गद्दारिचा शिक्का लावण्याचा प्रयत्न करु नका, असेही परब म्हणाले.
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्राचा दाखला देत रामदास कदम यांनी सांगितले की, अन्याय किती सहन करायचा याला देखील मर्यादा असतात. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना माझी हात जोडून विनंती आहे की, तुम्ही स्वत: यामध्ये लक्ष घाला. अनिल परबच्या डोक्यात हवा गेली आहे, त्याचे पाय जमिनीवर नाही. त्याचे पाय पुन्हा जमिनीवर आणा. मी उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात अनिल परबला हरामखोर म्हटलेलं आहे. त्याला हरामखोराला थांबावा, याला मंत्रीपद दिलं ते नेत्यांना संपवण्यासाठी नाही तर शिवसेना वाढवण्यासाठी दिलेलं आहे, असं त्या पत्रात लिहिलेलं होतं. या माझ्या भावना आहेत' असेही आपण पत्रात म्हटल्याचे रामदास कदम यांनी सांगितले.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)