Sant Nivruttinath Palkhi 2025: संत निवृत्तीनाथांच्या पालखीचे त्र्यंबकेश्वर मधून पंढरीकडे प्रस्थान

आषाढी एकादशी निमित्त वारी ची आकर्षण असलेल्या संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी 19 जून तर संत तुकाराम महाराजांची पालखी 20 जूनला प्रस्थान ठेवणार आहे.

Sant Nivruttinath Palkhi 2025: संत निवृत्तीनाथांच्या पालखीचे त्र्यंबकेश्वर मधून पंढरीकडे प्रस्थान
Nivruttinath Palkhi | Facebook.com@

Aashadhi Wari 2025: आषाढी वारीच्या सोहळ्यामध्ये तिसरी मानाची पालखी म्हणजे संत निवृत्तीनाथांची पालखी. नाशिकच्या त्र्यंबकेश्वर येऊन संत निवृत्तीनाथांच्या पालखीचे प्रस्थान होते. यंदा 6 जुलै च्या आषाढी एकादशीच्या सोहळ्यासाठी संत निवृत्तीनाथांची पालखी 10 जून दिवशी निघाली आहे. वारकर्‍यांच्या उपस्थितीमध्ये काल 10 जून दिवशी दुपारी 2 च्या सुमारास संत निवृत्तीनाथांचा पालखी प्रस्थान सोहळा सुरू झाला आहे. पंढरपूर वारीसाठी पायी दिंडी चांदीचा रथ पालखी संत निवृत्तीनाथांची प्रतिमा पादुका यासह प्रस्थान करतो. 27 दिवसांच्या प्रवासानंतर ही पालखी पंढरपूरला पोहोचणार आहे.

रीतीनुसार, तीर्थराज कुशावर्तावर पालखीचे स्वागत त्र्यंबकेश्वर नगरपालिकेकडून करण्यात येते. यावेळी गोदावरीचे स्नान अभिषेक संत निवृत्तीनाथांच्या प्रतिमा पादुकांना घालण्यात येते. Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025 Schedule: संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी प्रस्थानच्या वेळेत बदल; पहा कधी निघणार पालखी. 

संत निवृत्तीनाथांच्या पालखीचे प्रस्थान

संत निवृत्तीनाथांच्या पालखीचा प्रवास

संत निवृत्तीनाथांच्या पालखीचा  पहिला मुक्काम त्र्यंबकेश्वरपासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या महानिर्वाणी आखाड्यात  असतो. नाशिक शहर पोलिस बुधवारी सातपूरला पोहोचतील, जिथे ते रात्रीसाठी थांबतील आणि गुरुवारी सकाळी ते पंचायत समिती नाशिक कार्यालयात थांबतील. पुढचा मुक्काम नामदेव विठ्ठल मंदिर काजीपुरा येथे असेल आणि रात्रीचा मुक्काम गणेशवाडी येथील आयुर्वेद रुग्णालयात असेल. शुक्रवारी, 'पालखी' नाशिक रोडवरील मुक्तिधामकडे जाईल. शनिवारी, ती पंढरपूरकडे जाईल. पोलिसांनी मिरवणूक मार्गावर शहरातील वाहतूक वळवली आहे.

 संत निवृत्तीनाथांच्या पालखीसोबत काही मानाच्या दिंडींचा प्रवास देखील सुरू झाला आहे. दरम्यान 10 जून पासून सुरू झालेला हा प्रवास 5 जुलै पर्यंत चालणार आहे. संत निवृत्तीनाथांची पालखी 5 जुलै दिवशी पंढरपूर मध्ये पोहोचणार आहे. आता टप्प्याटप्प्याने राज्याच्या कानाकोपर्‍यामधून वारकरी मंडळी पंढरपूरच्या दिशेने प्रवासाला सुरूवात करणार आहेत. यंदा वारीत सहभागी होऊ न शकणार्‍या मात्र आषाढी एकादशी साठी पंढरपूरात येऊ इच्छिणार्‍यांसाठी रेल्वे प्रशासनाकडून विशेष रेल्वे आणि एसटी कडून विशेष बससेवा चालवली जाणार आहे.
आषाढी एकादशी निमित्त वारी ची आकर्षण असलेल्या संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी 19 जून तर संत तुकाराम महाराजांची पालखी 20 जूनला प्रस्थान ठेवणार आहे.

(The above story first appeared on LatestLY on Jun 11, 2025 01:01 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).