Mumbai: बस दुरुस्त करताना 32 वर्षीय मेकॅनिकचा मृत्यू; बस मालकाविरोधात गुन्हा दाखल

अवधेशचा भाऊ राजेशकुमार कनोजिया याने नीता टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे मालक सुनील सावला आणि अनिल सावला यांनी योग्य सुरक्षा सुविधा न पुरवल्याचा आरोप केला असून त्यामुळे त्याच्या भावाचा मृत्यू झाला. त्यांनी सावलांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Death (Image used for representational, purpose only) (Photo Credits: PTI)

Mumbai: बसच्या अंडर कॅरेजवर दुरुस्ती करत असताना एका 32 वर्षीय मेकॅनिक (Mechanic) चा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी नीता टूर्स अँड ट्रॅव्हल्स (Neeta Tours and Travels) या ट्रॅव्हल एजन्सी (Travel Agency) च्या मालकांविरुद्ध निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 7 ऑक्टोबर रोजी दहिसर पोलिस ठाण्यात आयपीसी कायद्याच्या कलम 304 (ए) (निष्काळजीपणामुळे मृत्यू) आणि 34 (सामान्य हेतूने केलेले कृत्य) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

एफआयआरनुसार, पालघर येथील अवधेश कनोजिया (वय, 32) हा गेल्या तीन महिन्यांपासून ट्रॅव्हल एजन्सीमध्ये मेकॅनिक म्हणून कामाला होता. 16 सप्टेंबर रोजी संध्याकाळी, ते बसच्या अंडर कॅरेजवर काम करत असताना, चाकाचा जॅक अचानक काढला गेला. ज्यामुळे चाक त्याच्यावर फिरले आणि ते गंभीर जखमी झाले. त्यांना दहिसर पूर्वेकडील नवनीत रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. (हेही वाचा -Satara Bus Accident: साताऱ्यात बस दुचाकीला चिरडून झाडावर आदळली, अपघातात एकाचा मृत्यू, प्रवाशी गंभीर जखमी)

अवधेशचा भाऊ राजेशकुमार कनोजिया याने नीता टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे मालक सुनील सावला आणि अनिल सावला यांनी योग्य सुरक्षा सुविधा न पुरवल्याचा आरोप केला असून त्यामुळे त्याच्या भावाचा मृत्यू झाला. त्यांनी सावलांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पर्यटन कंपनीने माझ्या भावाच्या बँक खात्यात एक लाख रुपये ट्रान्सफर केले असून त्याच्या अंतिम विधीसाठी आणखी एक लाख रुपये खर्च केले, परंतु त्यांनी 5 लाख रुपये देण्याचे आश्वासन दिले होते, त्यापैकी उर्वरित 3 लाख रुपये अद्याप भरलेले नाहीत, असं राजेशकुमार कनोजिया यांनी सांगितलं आहे. (हेही वाचा -

नीता टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे व्यवस्थापक कमलेश कानबर यांनी सांगितलं की, हा निव्वळ अपघात होता आणि अशा घटनेनंतर लोक काहीही बोलतात. आम्‍ही अनेक वर्षांपासून आमचा व्‍यवसाय चालवत आहोत आणि सुरक्षिततेच्‍या सोयी सदैव आहेत. आमच्या कंपनीने मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपये देण्याचे कोणतेही आश्वासन दिले नाही. आम्ही आधीच एक लाख रुपये रोख दिले आहेत आणि एक लाख रुपये त्यांच्या पत्नीच्या खात्यात ट्रान्सफर केले आहेत.

आम्ही अवधेशचा मृतदेह उत्तर प्रदेशातील त्याच्या मूळ गावी नेण्यासाठी रुग्णवाहिका दिली. मृताच्या कुटुंबात सध्या पैशांबद्दल वाद आहे, त्याच्या भावाने उर्वरित रक्कम त्याच्या भावाच्या खात्यात हस्तांतरित करण्याची विनंती केली आहे. वाद मिटल्यानंतर आम्ही पैसे हस्तांतरित करू, असं कानबर यांनी म्हटलं आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement