Campaign Against Obesity: प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी सुरु केली लठ्ठपणाविरोधी मोहीम; ओमर अब्दुल्ला, आनंद महिंद्रा,श्रेया घोषालसह 10 लोकांना केले नामांकित

गेल्या मन की बात कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी देशातील वाढत्या लठ्ठपणाच्या समस्येवर चर्चा केली. या रेडिओ कार्यक्रमात, पंतप्रधानांनी जगातील आरोग्य संघटनेच्या आकडेवारीचा हवाला देत म्हटले की, 2022 मध्ये, जागतिक स्तरावर सुमारे 250 कोटी लोक जास्त वजनाचे होते.

PM Narendra Modi | (Photo Credits: ANI/X)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी लठ्ठपणाविरुद्ध मोहीम सुरू केली. यासाठी त्यांनी विविध क्षेत्रातील 10 प्रमुख व्यक्तींना नामांकित केले. यामध्ये जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला, उद्योगपती आनंद महिंद्रा आणि मनु भाकर यांसारख्या व्यक्तिमत्त्वांची नावे आहेत. या मोहिमेद्वारे नामांकित केलेले लोक लठ्ठपणाविरुद्ध लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचे काम करतील. यासाठी, ते 10-10 लोकांना नामांकित करू शकतील, जेणेकरून मोहीम हळूहळू अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचेल. रविवारी, 23 फेब्रुवारी रोजी मन की बातमध्ये पंतप्रधानांनी लठ्ठपणाविरुद्ध मोहीम सुरू करण्याबद्दल भाष्य केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मासिक 'मन की बात' कार्यक्रम खूप लोकप्रिय आहे. गेल्या मन की बात कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी देशातील वाढत्या लठ्ठपणाच्या समस्येवर चर्चा केली. या रेडिओ कार्यक्रमात, पंतप्रधानांनी जगातील आरोग्य संघटनेच्या आकडेवारीचा हवाला देत म्हटले की, 2022 मध्ये, जागतिक स्तरावर सुमारे 250 कोटी लोक जास्त वजनाचे होते. हे आकडे खूप गंभीर आहेत आणि हे का घडत आहे याचा विचार करण्यास भाग पाडतात. जास्त वजन किंवा लठ्ठपणामुळे अनेक समस्या आणि आजार उद्भवतात. त्यांनी असेही म्हटले की,  कमी तेल वापरणे आणि लठ्ठपणाचा सामना करणे ही केवळ वैयक्तिक निवडीची बाब नाही तर कुटुंबाप्रती जबाबदारीची बाब आहे.

आता आज त्यांनी देशातील लठ्ठपणाविरुद्धच्या लढाईला बळकटी देण्यासाठी आणि जागरूकता पसरविण्यासाठी विविध क्षेत्रातील 10 प्रमुख व्यक्तींना नामांकित केले. त्यांनी चळवळ मोठी होण्यासाठी या 10 लोकांना 10-10 लोकांना नामांकित करण्याची विनंती केली. (हेही वाचा: India Fight with Obesity: स्वयंपाक घरात खाद्यतेल वापर कमी करा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अवाहन)

Campaign Against Obesity:

या लोकांना पंतप्रधानांनी नामांकित केले-

सुधा मूर्ती - इन्फोसिस फाउंडेशनच्या अध्यक्षा, लेखिका आणि राज्यसभा खासदार

नंदन नीलेकणी - इन्फोसिसचे सह-संस्थापक, माजी UIDAI अध्यक्ष

आनंद महिंद्रा - महिंद्रा ग्रुपचे अध्यक्ष

ओमर अब्दुल्ला - जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री

मनु भाकर - ऑलिंपिक चॅम्पियन नेमबाज

मीराबाई चानू - ऑलिंपिक चॅम्पियन वेटलिफ्टर

मोहनलाल - अभिनेता आणि निर्माता

आर माधवन – अभिनेता

श्रेया घोषाल - गायिका

निरहुआ हिंदुस्तानी - अभिनेता आणि भाजप खासदार

ऑलिंपियन नीरज चोप्रा आणि बॉक्सिंग चॅम्पियन निखत जरीन देखील या मोहिमेमध्ये सामील झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बातच्या भागात आरोग्याबद्दल बोलताना सांगितले की, तंदुरुस्त आणि निरोगी भारत होण्यासाठी आपल्याला लठ्ठपणाच्या समस्येचा सामना करावा लागेल. एका अभ्यासानुसार, आज दर आठपैकी एक व्यक्ती लठ्ठपणाच्या समस्येने ग्रस्त आहे. गेल्या काही वर्षांत लठ्ठपणाच्या घटनांमध्ये दुप्पट वाढ झाली आहे, परंतु त्याहूनही चिंताजनक बाब म्हणजे मुलांमध्ये लठ्ठपणाची समस्याही चौपट वाढली आहे. लठ्ठपणाने ग्रस्त असलेल्या लोकांच्या संख्येत भारत आता जागतिक स्तरावर अमेरिका आणि चीननंतर तिसऱ्या क्रमांकावर आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now