Shardiya Navratri 2024: शारदीय नवरात्रीच्या पहिल्या दिवशी बार्लीची पेरणी का करतात? कशी सुरू झाली परंपरा? वाचा A टू Z माहिती
पौराणिक कथेनुसार जेव्हा पृथ्वीवर दानव आणि राक्षसांचे अत्याचार वाढत होते, तेव्हा माता दुर्गेने राक्षसांचा वध करून लोकांचे प्राण वाचवले. अशी एक धार्मिक मान्यता आहे की माता दुर्गा आणि असुर यांच्या संघर्षाच्या वेळी पृथ्वीवर दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली होती. राक्षसांना मारल्यानंतर, पृथ्वीवर प्रथम बार्ली वाढली.
Shardiya Navratri 2024: सनातन धर्मात, शारदीय नवरात्री (Shardiya Navratri 2024) हा सण अधिक उत्साहाने साजरा केला जातो. यानिमित्त दुर्गा देवीची मंदिरे अतिशय सुंदर पद्धतीने सजवण्यात येतात. या काळात दुर्गा माता मंदिरांमध्ये भक्तांची गर्दी पाहायला मिळते. शारदीय नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते. तसेच, दुर्गा देवीच्या विशेष पूजेनंतर जव (Barley) पेरले जाते. पौराणिक माण्यतानुसार, घटस्थापनेच्या दिवशी जव म्हणजेच बार्ली पेरल्याने घरात सुख-समृद्धी येते. तसेच आयुष्यात कधीही पैशांची कमतरता भासत नाही. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी बार्लीची पेरणी का केली जाते? असा प्रश्न तुम्हालाही पडला आहे का? ही परंपरा नेमकी कशी सुरू झाली? यामागचं धार्मिक महत्त्व काय आहे? या सर्व प्रश्नांची उत्तर जाणून घेऊयात.
घटस्थापनेच्या दिवशी बार्लीची पेरणी का करतात? काय आहे यामागील कथा?
पौराणिक कथेनुसार जेव्हा पृथ्वीवर दानव आणि राक्षसांचे अत्याचार वाढत होते, तेव्हा माता दुर्गेने राक्षसांचा वध करून लोकांचे प्राण वाचवले. अशी एक धार्मिक मान्यता आहे की माता दुर्गा आणि असुर यांच्या संघर्षाच्या वेळी पृथ्वीवर दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली होती. राक्षसांना मारल्यानंतर, पृथ्वीवर प्रथम बार्ली वाढली. म्हणूनच सनातन धर्मात नवरात्रीच्या काळात बार्ली पेरणे हे प्रजनन आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. (हेही वाचा -Shardiya Navratri 2024 Ghatasthapana Muhurat: घटस्थापना कधी आहे? शुभ मुहूर्त, पूजाविधी आणि महत्त्व घ्या जाणून)
घटस्थापनेच्या दिवशी बार्ली पेरण्यामागील धार्मिक मान्यता -
दुसऱ्या मान्यतेनुसार, जेव्हा ब्रह्मदेवाने विश्वाची निर्मिती केली तेव्हा बार्ली हे पहिले पीक होते. त्यामुळे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी बार्लीची पेरणी का केली जाते. नवरात्रीच्या काळात पेरलेली बार्ली अनेक विशेष चिन्हे देते. बार्लीचा रंग पांढरा किंवा हिरवा झाला असेल तर ते शुभ संकेत देते. असे मानले जाते की याचा अर्थ व्यक्तीच्या जीवनातील सर्व प्रकारच्या समस्या लवकरच दूर होऊ शकतात. याशिवाय जर बार्ली उगवली आणि विकसित झाली तर ते शुभ मानले जाते. याचा अर्थ घरामध्ये समृद्धी आणि आनंद येईल.
बार्ली पेरणीची पद्धत -
नवरात्रीच्या पहिल्या दिवशी कलशाची स्थापना केल्यानंतर मातीच्या भांड्यात शुद्ध माती ओतली जाते आणि त्यात जवाच्या बिया पेरल्या जातात. हे पात्र देवीच्या समोर ठेवलं जातं. या पात्रात रोज पाणी अर्पण केलं जातं. बार्लीच्या बियांची वाढ हे जीवनातील नवीन ऊर्जा, प्रगतीचे प्रतीक आहे. जव जितके जलद आणि चांगले अंकुरित होते तितके कुटुंबासाठी ते अधिक शुभ मानले जाते. नवरात्रीचा हा विधी प्रत्येक घरात शुभ, समृद्धी आणि प्रगती साधण्यासाठी केला जातो.
Disclaimer: या लेखात नमूद केलेले उपाय/फायदे/सल्ला आणि विधाने केवळ सामान्य माहितीसाठी आहेत. लेटेस्टली मराठी या लेखाच्या वैशिष्ट्यामध्ये येथे लिहिलेल्या गोष्टींना दुजोरा देत नाही. या लेखातील माहिती विविध माध्यमे/ज्योतिषी/पंचांग/उपदेश/श्रद्धा/शास्त्र/कथांमधून संकलित करण्यात आली आहे. वाचकांना विनंती आहे की त्यांनी लेखाला अंतिम सत्य किंवा दावा न मानून त्यांचा विवेक वापरावा.
(The above story first appeared on LatestLY on Sep 28, 2024 06:46 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

