Heat Wave Alert in North India: देशात उष्णतेची तीव्र लाट, दिल्लीसह उत्तर भारताला पुढील 5 दिवसाचा रेड अलर्ट

मान्सून आगमन लवकरच होणार असल्याच्या बातम्या मन सुखावत असल्या तरी प्रत्यक्षात मात्र देशभरात उन्हाळा तीव्र जाणवत आहे. दिवसेंदिवस तापमान अधिकच वाढत असून देशभरात उष्णतेची लाट निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे.

Heat Stroke | Image Used For representational Purpose | Pixabay.com

पुढील पाच दिवसांत राजस्थान, पंजाब, हरियाणा-चंदीगड-दिल्ली आणि पश्चिम उत्तर प्रदेशच्या काही भागांमध्ये उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यता आहे, असे भारतीय हवामान खात्याने म्हटले आहे. या राज्यांसाठी 'रेड अलर्ट' जारी करताना, हवामान खात्याने असेही म्हटले आहे की या राज्यांतील अनेक जिल्ह्यांमध्ये दिवसाचे कमाल तापमान 47 अंश सेल्सिअसच्या पातळीच्या पुढे जाऊ शकते. "उत्तर पश्चिम भारतात सध्या तापमान सामान्यपेक्षा जास्त आहे आणि आम्ही गेल्या दोन ते तीन दिवसांपासून या प्रदेशासाठी 'रेड अलर्ट' जारी केला होता," असे वरिष्ठ IMD शास्त्रज्ञ नरेश कुमार यांनी वृत्तसंस्था एएनआयला सांगितले. (हेही वाचा - IMD Heat Wave Alert India: देशभरात उष्णतेची लाट, नागरिकांच्या आरोग्य आणि उपजीविकेवर परिणाम; IMD कडून 'रेड अलर्ट', जाणून घ्या हवामान अंदाज)

"पंजाब आणि हरियाणामध्ये, वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे कमाल तापमानात किरकोळ घट नोंदवली गेली आहे, परंतु ते हळूहळू दोन ते तीन अंशांनी वाढेल, ज्यासाठी आम्ही आधीच 'रेड अलर्ट' जारी केला आहे, शेजारच्या उत्तर प्रदेशात आम्ही जारी केला आहे. पुढील पाच दिवसांसाठी ‘रेड अलर्ट’ आणि मध्य प्रदेशच्या उत्तर भागांसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे,” असे कुमार यांनी सांगितले. मंगळवारी सलग पाचव्या दिवशी भारताच्या मोठ्या भागात उष्णतेची लाट पसरली, ज्यामुळे आरोग्य आणि उपजीविकेवर परिणाम झाला.

दक्षिणेकडील राज्यांमध्ये मुसळधार पाऊस

उत्तर भारतातील काही भागात उन्हाळ्याच्या झळा पोहचत असताना दुसरीकडे दक्षिम भारतात मात्र मुसळधार पावसाचा इशारा हा देण्यात आला आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत तामिळनाडू आणि केरळमध्ये 12 सेंटीमीटरपर्यंत मुसळधार ते अतिवृष्टीचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement