Qutub Minar चे नाव बदलून Vishnu Stambh ठेवावे; हिंदू संघटनेची मागणी, दिल्लीत निदर्शने

आजच्या या आंदोलनावेळी कुतुबमिनारच्या बाहेर कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. गेल्या महिन्यात विश्व हिंदू परिषदेचे प्रवक्ते विनोद बन्सल यांनी एएनआयला सांगितले की, कुतुबमिनार हा खरे तर 'विष्णू स्तंभ' होता. 27 हिंदू-जैन मंदिरे पाडून कुतुबमिनार बांधण्यात आला

Qutub Minar (Photo credits: Pixabay)

दिल्लीत (Delhi) सध्या विविध ठिकाणांची, जागांची नावे बदलण्याचे राजकारण जोरात सुरू आहे. भाजपने दिल्लीतील अनेक गावांची नावे बदलण्याचा प्रस्ताव सरकारकडे पाठवला असतानाच, मंगळवारी हिंदू संघटनेने कुतुबमिनार (Qutub Minar) येथे निदर्शने केली. कुतुबमिनारचे नाव बदलून विष्णूस्तंभ (Vishnu Stambh) ठेवावे, अशी मागणी हिंदू संघटनांनी केली आहे. यावेळी कुतुबमिनार परिसराजवळ हनुमान चालिसाचे पठणही करण्यात आले. कुतुबमिनारला विष्णूस्तंभ असे नाव देण्याचे आवाहन संयुक्त हिंदू आघाडीतर्फे करण्यात आले आहे.

युनायटेड हिंदू फ्रंटने असा दावा केला आहे की कुतुबमिनार हा एक विष्णू स्तंभ आहे. 27 जैन आणि हिंदू मंदिरे पाडून हा टॉवर बांधण्यात आला. ही निषेधाची हाक 'संयुक्त हिंदू आघाडी'चे कार्याध्यक्ष जय भगवान गोयल यांनी दिली आहे. गोयल यांनी इतर हिंदू गटांना कुतुबमिनार आवारात हनुमान चालिसाच्या जपात सामील होण्याचे आवाहन केले आणि सांगितले की त्यांना मशिदीत प्रार्थना करण्याची परवानगी द्यावी किंवा मशिदीतून मूर्ती हटवाव्यात.

गोयल पुढे म्हणाले की, आवारात अजूनही अनेक हिंदू मूर्ती आहेत आणि त्यातील अनेक तुटलेल्या आहेत, हा पुरावा आहे की तेथे मंदिर पाडण्यात आले होते. या ठिकाणच्या तुटलेल्या मूर्तींचे विसर्जन करण्याची परवानगी गोयल यांनी मागितली. दिल्ली पर्यटनानुसार, कुतुबमिनार हा विजयाचा 73-मीटर-उंच टॉवर आहे, जो दिल्लीच्या शेवटच्या हिंदू राज्याच्या पराभवानंतर, 1193 मध्ये कुतुबुद्दीन ऐबकने बांधला होता. (हेही वाचा: कर्नाटकात 'लाऊडस्पीकरवर अजान'वरून वाद वाढला, ध्वनी प्रदूषणाविरोधात कारवाईचा इशारा)

आजच्या या आंदोलनावेळी कुतुबमिनारच्या बाहेर कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. गेल्या महिन्यात विश्व हिंदू परिषदेचे प्रवक्ते विनोद बन्सल यांनी एएनआयला सांगितले की, कुतुबमिनार हा खरे तर 'विष्णू स्तंभ' होता. 27 हिंदू-जैन मंदिरे पाडून कुतुबमिनार बांधण्यात आला. सरकारने कुतुबमिनार संकुलातील प्राचीन मंदिरांची पुनर्बांधणी करावी आणि तेथे हिंदू विधी आणि प्रार्थना पुन्हा सुरू करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी विहिंपने शनिवारी केली.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now