Government Education Decision: आता 5वी आणि 8वीत नापास झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात बढती नाही मिळणार, केंद्र सरकारने 'नो डिटेन्शन पॉलिसी' संपवली

जर विद्यार्थी पुन्हा परीक्षेत नापास झाला तर त्याला उच्च वर्गात पाठवले जाणार नाही. यासोबतच आठवीच्या वर्गातून कोणालाही काढून टाकले जाणार नाही. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक निकाल सुधारण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे शिक्षण मंत्रालयाचे सचिव कुमार यांनी सांगितले.

Credit-(Pixabay )

Government Education Decision:   मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार आता 'नो डिटेन्शन पॉलिसी' रद्द करण्यात आली आहे. आता इयत्ता 5वी आणि 8वीच्या परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांना बढती मिळणार नाही. आता इयत्ता 5वी आणि 8वीच्या परीक्षा विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या ठरणार आहेत. या परीक्षांमध्ये विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्यास त्यांना दुसऱ्या वर्गात पाठवले जाणार नाही. (हेही वाचा - महाराष्ट्रात राज्य शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये CBSE पॅटर्न, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली माहिती)

मात्र, विद्यार्थी पुन्हा ही परीक्षा देऊ शकतील, असे बोलले जात आहे. विद्यार्थ्यांची वाचन क्षमता सुधारण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे, केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने विद्यार्थ्यांची शैक्षणिक कामगिरी सुधारण्यासाठी नो डिटेन्शन पॉलिसी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे, हे धोरण बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. आता नव्या प्रणालीनुसार इयत्ता 5वी आणि 8वीच्या वार्षिक परीक्षेत अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षेला बसण्याची संधी दिली जाणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जर विद्यार्थी पुन्हा परीक्षेत नापास झाला तर त्याला उच्च वर्गात पाठवले जाणार नाही. यासोबतच आठवीच्या वर्गातून कोणालाही काढून टाकले जाणार नाही. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक निकाल सुधारण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे शिक्षण मंत्रालयाचे सचिव कुमार यांनी सांगितले.

शिक्षणाचा दर्जा आणि निकाल सुधारण्यासाठी घेतलेला निर्णय

अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची शिकण्याची क्षमता सुधारण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे, कारण हे वर्ग मूलभूत शिक्षणासाठी महत्त्वाचे मानले जातात मुले त्यांच्या अभ्यासासाठी अधिक जबाबदार असतात.

 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement