Missing Meitei Man: मणिपूरमध्ये परिस्थिती चिंताजनक! बेपत्ता पतीसाठी महिलेचे आंदोलन; पतीला जिवंत आणि सुरक्षित आणण्याची लष्कराकडे मागणी
मैतेई महिला बेपत्ता पतीसाठी उपोषणावर बसली आहे. महिला शनिवारी संध्याकाळपासून सुरक्षा कर्मचाऱ्यांसमोर काटेरी तारांच्या बॅरिकेड्ससमोर बसली आहे.
Missing Meitei Man: मणिपूरमधील परिस्थिती अजूनही चिंताजनक (Manipur Violence) आहे. तिथे, एक मैतेई महिला बेपत्ता पतीसाठी उपोषणावर बसली ( Manipur Protests)आहे. लैश्राम कमल बाबूची असे बेपत्ता पतीचे नाव (Missing Meitei Man)आहे. महिला शनिवारी संध्याकाळपासून सुरक्षा कर्मचाऱ्यांसमोर काटेरी तारांच्या बॅरिकेड्ससमोर बसली आहे. “माझ्या पतीला शोधून मला सोपवले जात नाही तोपर्यंत मी येथून हलणार नाही”असे महिलेने म्हटले आहे. 25 नोव्हेंबर रोजी कांगपोकपी जिल्ह्यातील लीमाखाँग मिलिटरी स्टेशनमधून तो बेपत्ता झाल्यानंतर निदर्शने सुरू झाली. (Manipur Violence: मणिपूरमध्ये सुरु असलेल्या हिंसाचारामुळे 5 जिल्ह्यांमध्ये उद्यापर्यंत शैक्षणिक संस्था बंद)
बेलाराणी यांच्या नेतृत्वाखाली महिला आंदोलकांनी बॅरिकेड्स हटवून बेपत्ता व्यक्तीचा शोध घेण्याची मागणी करत लष्कराच्या छावणीकडे मोर्चा वळवला आणि तणाव वाढला. बेपत्ता इसमाती पत्नी अकोइजाम निंगोल लैश्राम ओंगबी बेलारानी यांनी सांगितले की, सोमवारी दुपारपासून पतीचा फोन आला नाही. त्यामुळे तिची भीती आणखी वाढली. महिलेने सांगितले की तिने 25 नोव्हेंबरला पतीशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा फोन बंद होता. (Manipur Violence: मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार भडकला, इम्फाळमध्ये कर्फ्यू दरम्यान सर्व सरकारी शाळा आणि महाविद्यालये 19 नोव्हेंबरपर्यंत बंद)
पती बेपत्ता झाल्याची बातमी ऐकून मी आज कचारहून आले आहे.” सुरक्षा रक्षकांनी महिलेला तिथे जाण्यास सांगितले. मात्र, कुठेही जाण्यास नकार देत ती म्हणाली, “सैनिकांनी माझ्या पतीला जिवंत आणि सुरक्षित शोधले पाहिजे.” आसामच्या कचार जिल्ह्यातील रहिवासी असलेला बाबू कॅम्पमध्ये काम करत असताना लोईतांग खुनौ येथे आपल्या भावाच्या घरी राहत होता. तो अचानक गायब झाला. गेल्या आठवड्याभरापासून तो बेपत्ता असल्याचे सांगितले जात आहे.
परिसरात निदर्शने सुरू झाली
या घटनेनंतर, इम्फाळ खोऱ्यात व्यापक निदर्शने उफाळून आली असून, अधिकाऱ्यांनी तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. जनक्षोभानंतर, लष्कराने एक निवेदन जारी करून बाबूच्या शोध मोहिमेला पुष्टी दिली. मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांनीही लष्कराला बेपत्ता व्यक्तीचा शोध घेण्याची जबाबदारी घेण्यास सांगितले आहे. 3 मे 2023 पासून ईशान्य राज्यातील इम्फाळ व्हॅलीमध्ये मीतेई आणि कुकी गटांमधील जातीय संघर्षात 200 हून अधिक लोक मारले गेले. हजारो लोक बेघर झाले आहेत.
(The above story first appeared on LatestLY on Dec 01, 2024 11:11 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

