आर्थिक मंदीचा फटका आता सुतकामाला, हजारो लोकांना नोकरीवर सोडावे लागणार पाणी
देशात आर्थिक मंदीचा फटका आता सुतकामाला बसला आहे. त्यामुळे आता सुतकाम (Spinning) उद्योगात मंदीत आली असून हजारो लोकांना त्यांच्या नोकरीवर आता पाणी सोडावे लागणार आहे. देशात जवळजवळ तृतीयांश टक्के सुतकाम उत्पादन बंद झाले आहे. या स्थितीमुळे सुतकामात मोठा तोटा होत आहे.
देशात आर्थिक मंदीचा फटका आता सुतकामाला बसला आहे. त्यामुळे आता सुतकाम (Spinning) उद्योगात मंदीत आली असून हजारो लोकांना त्यांच्या नोकरीवर आता पाणी सोडावे लागणार आहे. देशात जवळजवळ तृतीयांश टक्के सुतकाम उत्पादन बंद झाले आहे. या स्थितीमुळे सुतकामात मोठा तोटा होत आहे.
नॉर्दन इंडिया टेक्सटाइल मिल्स असोसिएशन यांच्या अनुसार राज्य आणि केंद्रीय जीएसटीसह अन्य काही कारणांमुळे भारतीय यार्न आंतरराष्ट्रीय बाजारात प्रतिस्पर्धेसाठी टिकून राहिलेला नाही. तर एप्रिल ते जून या तीन महिन्याचा कालावधीत कॉर्टन यार्नच्या निर्यातीत प्रत्येक वर्षाला 34.6 टक्के घट झाल्याचे दिसून आले आहे. तर जून महिन्यात 50 टक्क्यांपर्यंत घट झाली आहे.(कुणी नोकरी देतं का नोकरी? आर्थिक मंदी नोकरीच्या मुळावर; Automobile सेक्टरसह अनेक क्षेत्रात नोकरभरती मंदावली)
सुतकाम गिरण्यांच्या या परिस्थितीमुळे आता भारतीय कापुस खरेदी करु शकत नाही आहेत. परंतु मंदीची स्थिती कायम राहिल्यास जवळजवळ 80 हजार करोड लोकांची नोकरी जाऊ शकते. आता पर्यंत भारतीय टेक्सटाइल इंडस्ट्रीमध्ये प्रत्यक्ष आणि अप्रत्यरित्या 10 करोड लोकांना रोजगार मिळाला आहे. तर शेतीव्यवसानंतर बहुतांश लोक सुतकाम व्यवसायात काम करताना दिसून येतात. सुतकामगारांच्या नोकऱ्या जाण्यामागील काही कारणे असून त्यामध्ये उद्योग कर्जावरील उच्च व्याजदर, कच्च्या मालाची किंमत, कापूस आणि यार्न सारख्या स्वस्त आयातीमधून ही गंभीर स्थिती निर्माण झाली आहे.
(The above story first appeared on LatestLY on Aug 20, 2019 02:00 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

