Maha Kumbh Mela Special Trains: दिल्लीतील चेंगराचेंगरीनंतर 4 महाकुंभ विशेष गाड्यांची घोषणा; रेल्वेचा मोठा निर्णय

रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी आणि महाकुंभमेळ्यादरम्यान होणारी अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेने 4 महाकुंभमेळ्याच्या विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

Railway प्रतिकात्मक फोटो | (Photo Credits: PTI)

Maha Kumbh Mela Special Trains: नवी दिल्लीत (New Delhi) शनिवारी झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणाच्या पाश्वभूमीवर उत्तर रेल्वेने मोठी निर्णय घेतला आहे. रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी आणि महाकुंभमेळ्यादरम्यान होणारी अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेने 4 महाकुंभमेळ्याच्या विशेष गाड्या (Maha Kumbh Mela Special Trains) चालवण्याचा निर्णय घेतला आहे. शनिवारी रात्री नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर प्रचंड गर्दी जमल्यानंतर चेंगराचेंगरी झाली होती. या चेंगराचेंगरीच्या घटनेत 18 जणांचा मृत्यू झाला होता. तसेच अनेक जण जखमी झाले होते.

महाकुंभासाठी चालवण्यात येणार 'या' चार रेल्वे गाड्या -

दरम्यान, शनिवारी रात्री नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीत अठरा जणांचा मृत्यू झाला. एका वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्याने सांगितले की, काही प्रवासी पादचारी पुलावरून उतरताना घसरले आणि इतर प्रवाशांवर पडले. प्रयागराजला जाणाऱ्या ट्रेनमध्ये चढण्यासाठी प्लॅटफॉर्म क्रमांक 14 आणि 15 वर प्रवाशांची मोठी गर्दी जमली असताना ही दुर्दैवी घटना घडली.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement