Bhaiyyu Maharaj Suicide Case: भय्यू महाराज आत्महत्या प्रकरणी 3 दोषींना 6 वर्षांची शिक्षा; इंदूर जिल्हा न्यायालयाचा निर्णय

महाराजांच्या आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल त्यांचे सेवक विनायक, शरद आणि पलक बराच काळ तुरुंगात आहेत. अतिरिक्त सत्र न्यायाधीश धर्मेंद्र सोनी यांच्या न्यायालयात दोन सत्रांत साडेपाच तास सुनावणी झाली.

Bhaiyyu Maharaj Suicide Case: भय्यू महाराज आत्महत्या प्रकरणी 3 दोषींना 6 वर्षांची शिक्षा; इंदूर जिल्हा न्यायालयाचा निर्णय
Bhaiyyu Maharaj (फोटो सौजन्य - फेसबूक)

Bhaiyyu Maharaj Suicide Case: मध्य प्रदेशातील प्रसिद्ध राष्ट्रसंत भय्यू महाराज (Bhaiyyu Maharaj) यांच्या आत्महत्येप्रकरणी इंदूर कोर्टात शुक्रवारी अंतिम सुनावणी झाली. न्यायालयाने विनायक, चालक शरद आणि केअरटेकर पलक यांना दोषी ठरवले आहे. या सर्वांना 6 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. आदेशात म्हटले आहे की, भैय्यू महाराज यांचा नोकरदारांनी इतका छळ केला की त्यांनी आत्महत्या केली.

मिळालेल्या माहितीनुसार, साडेतीन वर्षांच्या सुनावणीनंतर सत्र न्यायालयाने हा निकाल दिला. आज 32 साक्षीदारांची सुनावणी झाली. उच्च न्यायालयाने हा गुन्हा सिद्ध केला आहे. महाराजांच्या आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सत्र न्यायाधीश धर्मेंद्र सोनी यांनी महाराजांचे सेवक शरद देशमुख, विनायक दुधाळे आणि पलक पुराणिक यांना शिक्षा सुनावली. आरोपी पैशासाठी महाराजांचा छळ करत होते. त्यांना पैशांसाठी ब्लॅकमेलही करण्यात आले. (वाचा - RRB-NTPC Protest: खान सर यांच्या विरोधात एफआयआर दाखल, व्हिडिओ जाहीर करत आंदोलन थांबवण्याचे उमेदवारांना केले अपील)

भय्यू महाराज यांनी 12 जून 2018 रोजी स्वतःच्या कपाळावर गोळी झाडून आत्महत्या केली होती. भैय्यू महाराजांना कुटुंबापेक्षा जे सेवेदार होते, ज्यांच्यावर त्यांचा एवढा विश्वास होता की त्यांनी त्यांचा आश्रम त्यांच्याकडे सोपवले होते. त्याच सेवेदारांनी त्यांना पैशासाठी एवढा त्रास दिला की, त्यांना आत्महत्येसारखे पाऊल उचलावे लागले.

याप्रकरणी 19 जानेवारीला साडेपाच तास सुनावणी झाली. यात भय्यू महाराज आत्महत्या प्रकरणाचा निकाल 28 जानेवारीला सुनावण्यात येणार असल्याचे निश्चित करण्यात आले. महाराजांच्या आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल त्यांचे सेवक विनायक, शरद आणि पलक बराच काळ तुरुंगात आहेत. अतिरिक्त सत्र न्यायाधीश धर्मेंद्र सोनी यांच्या न्यायालयात दोन सत्रांत साडेपाच तास सुनावणी झाली.

आरोपी विनायकच्यावतीने अधिवक्ता आशिष चौरे यांनी युक्तिवाद केला. यापूर्वी दोन आठवडे सरकारच्या वतीने शरद आणि विनायक यांच्यात अंतिम चर्चा झाली होती. महाराजांनी स्वत:वर गोळी झाडण्यापूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये ट्रस्टची जबाबदारी विनायकवर सोपवण्यात आली होती, त्यांच्या नावावर असलेली संपत्ती नाही, असा युक्तिवाद विनायकच्या वकिलाने केला. घटनेच्या काही दिवसांपूर्वी भय्यू महाराज पुण्याला जात होते. त्यांना वारंवार कोणाचे तरी फोन येत होते, त्याचाही पोलिसांनी योग्य तपास केला नाही, अन्यथा योग्य आरोपी सापडला असता. यापूर्वी शरदचे वकील धर्मेंद्र गुर्जर यांनी दोन दिवसांत 10 तास तर पलकचे वकील अविनाश सिरपूरकर यांनी पाच दिवस युक्तिवाद केला होता. या खटल्यात 30 हून अधिक साक्षीदारांचे जबाब घेण्यात आले आहेत.

(The above story first appeared on LatestLY on Jan 28, 2022 03:38 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).