Khel Ratna Nominations: खेलरत्न नामांकनातून Manu Bhaker गायब; 'अंतिम यादी अद्याप ठरलेली नाही', क्रिडा मंत्रालयाचे स्पष्टीकरण

ऑलिम्पिक 2024 मध्ये दोन पदके जिंकणारी नेमबाज मनू भाकरचे नाव या वर्षीच्या मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी नामांकित खेळाडूंच्या यादीत नसल्याचं समोर आलं आहे

Khel Ratna Nominations: खेलरत्न नामांकनातून Manu Bhaker गायब; 'अंतिम यादी अद्याप ठरलेली नाही', क्रिडा मंत्रालयाचे स्पष्टीकरण
Manu Bhaker (फोटो सौजन्य - ट्विटर)

Khel Ratna Nominations: ऑलिम्पिक 2024 मध्ये दोन पदके जिंकणारी नेमबाज मनू भाकर (Manu Bhaker) चे नाव या वर्षीच्या मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी (Major Dhyan Chand Khel Ratna Award) नामांकित खेळाडूंच्या यादीत नसल्याचं समोर आलं आहे. 2024 पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 10 मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत कांस्य पदक जिंकून मनू भाकर ऑलिम्पिक पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला नेमबाज ठरली होती. यासोबतच मनूने सरबज्योत सिंगसोबत 10 मीटर एअर पिस्तूल सांघिक स्पर्धेत आणखी एक कांस्यपदक जिंकून इतिहास रचला. मनू भाकरकडे दुर्लक्ष केल्याच्या वृत्तांदरम्यान, क्रीडा मंत्रालयाशी संबंधित एका सूत्राने सांगितले की, 'नावे अद्याप ठरलेली नाहीत आणि एका आठवड्यात पुरस्कार जाहीर झाल्यावर त्यांचे नाव यादीत असेल.'

अर्ज करूनही निवड नाही -

सोमवारी मनू भाकरशी संबंधित सूत्रांनी सांगितले की, दोन वेळा पदक विजेत्या नेमबाजाने खेलरत्न पुरस्कारासाठी अर्ज केला होता, परंतु तिची निवड झाली नाही. हे सर्वांसाठी धक्कादायक आहे. NRAI ची यात कोणतीही भूमिका नाही. दरम्यान, एनआरएआयच्या वतीने अध्यक्ष कालिकेश नारायण सिंह देव यांनी मनू भाकरच्या प्रकरणाचा विचार करण्यासाठी क्रीडा मंत्रालयाला पत्र लिहिले आहे. (हेही वाचा -Manu Bhaker यांच्या आईचे Neeraj Chopra सोबत हृदयस्पर्शी संभाषण, व्हिडीओ व्हायरल)

अंतिम यादी अद्याप ठरलेली नाही - क्रीडा मंत्रालय

क्रीडा मंत्रालयाशी संबंधित एका अधिकाऱ्याने सांगितले की, अंतिम यादी अद्याप ठरलेली नाही. क्रीडामंत्री मनसुख मांडविया या शिफारशीवर एक-दोन दिवसांत निर्णय घेतील आणि मनूचे नाव अंतिम यादीत येण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश व्ही रामसुब्रम यांच्या अध्यक्षतेखालील 12 सदस्यीय पुरस्कार समितीमध्ये भारतीय महिला हॉकी संघाची माजी कर्णधार राणी रामपाल यांच्यासह माजी खेळाडूही आहेत. मंत्रालयाच्या नियमांनुसार, खेळाडूंना त्यांचे अर्ज स्वतः भरण्याची परवानगी आहे. ज्यांनी अर्ज केले नाहीत त्यांच्या नावाचाही निवड समिती विचार करू शकते. (हेही वाचा - Manu Bhaker Wins Bronze: कोण आहे मनू भाकर? जाणून घ्या, पिस्तूलमध्ये बिघाड झाल्यामुळे 2020 टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदक गमावण्यापासून ते पॅरिसमध्ये कास्यपदक जिंकण्यापर्यंतचा प्रवास)

भारतात ऑलिम्पिक खेळांना महत्त्व नाही - रामकिशन भाकर

मनूने अर्ज केला नसल्याचा दावा मंत्रालयाने केला पण त्याचे वडील रामकिशन भाकर यांनी अर्ज केल्याचे सांगितले. ते म्हणाले, 'भारतात ऑलिम्पिक खेळांना महत्त्व नाही, कारण दोन ऑलिम्पिक पदके जिंकूनही मनूला खेलरत्न पुरस्कारासाठी दुर्लक्षित करण्यात आले. सन्मानासाठी हात पसरावे लागतील तेव्हा देशासाठी खेळून पदक जिंकून काय उपयोग.'

(The above story first appeared on LatestLY on Dec 24, 2024 10:09 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).