
Vijay Mallya Reaction: आयपीएल 2025चा अंतिम सामना क्रिकेट इतिहासातील एक स्मरणीय क्षण बनला जेव्हा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) ने पंजाब किंग्जचा पराभव करून पहिल्यांदाच आयपीएल ट्रॉफी जिंकली. हा विजय केवळ एका संघाचा नव्हता, तर लाखो चाहत्यांच्या दीर्घ प्रतीक्षेचा आणि विश्वासाचा विजय होता. सोशल मीडियावर जल्लोषाचे वातावरण होते आणि या प्रसंगी आरसीबीचे पहिले मालक विजय मल्ल्या यांची एक भावनिक पोस्ट देखील समोर आली.
विजय मल्ल्या काय म्हणाले?
2008 मध्ये आरसीबीची स्थापना करणारे विजय मल्ल्या यांनी संघाच्या ऐतिहासिक विजयाबद्दल एक्सवर लिहिले की; "आरसीबी अखेर 18 वर्षांनी आयपीएल चॅम्पियन बनले. 2025 च्या संपूर्ण स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी. संतुलित संघ, उत्कृष्ट प्रशिक्षक कर्मचारी. खूप खूप अभिनंदन! ई साला कप नामडे!!"
त्यांनी पुढे लिहिले की, "जेव्हा मी आरसीबीची स्थापना केली. तेव्हा माझे स्वप्न होते की आयपीएल ट्रॉफी बेंगळुरूला यावी. मला तरुण क्रीकेटर म्हणून किंग कोहलीची निवड करण्याचा बहुमान मिळाला आणि तो 18 वर्षे संघासोबत खेळला. मी युनिव्हर्स बॉस ख्रिस गेल आणि मिस्टर 360 एबी डिव्हिलियर्स यांनाही संघाचा भाग बनवले. शेवटी, ट्रॉफी बेंगळुरूला आली. आरसीबी चाहते या विजयाचे पात्र आहेत."