Nathan Lyon On WTC Final: डब्ल्यूटीसी फायनल तीन सामन्यांची मालिका असावी, ऑस्ट्रेलियाचा अनुभवी फिरकीपटू नॅथन लायनने केली मागणी
जागतिक कसोटी चॅम्पियनशिपची अंतिम तीन सामन्यांची कसोटी मालिका असावी, असे मत नॅथन लायनचे आहे. त्याचा निकाल एका सामन्यातून मिळू नये. कसोटी क्रिकेटमध्ये 530 विकेट्स घेणारा नॅथन लियॉन म्हणाला...
ICC World Test Championship Final: ऑस्ट्रेलियाचा स्टार फिरकीपटू नॅथन लायनने (Nathan Lyon) वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपबाबत (World Test Championship Final) मोठे वक्तव्य केले आहे. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपची अंतिम तीन सामन्यांची कसोटी मालिका असावी, असे मत नॅथन लायनचे आहे. त्याचा निकाल एका सामन्यातून मिळू नये. कसोटी क्रिकेटमध्ये 530 विकेट्स घेणारा नॅथन लियॉन म्हणाला, "मला एक गोष्ट पहायची आहे की WTC फायनल एका कसोटी सामन्याऐवजी तीन सामन्यांची कसोटी मालिका असावी. ते थोडे चांगले असू शकते, कारण तुम्ही एका सत्रात कसोटी सामना गमावू शकता, जर तीन सामन्यांची कसोटी मालिका तुम्हाला पुनरागमन करण्याती संधी देते.
तुम्ही ही मालिका तीन वेगवेगळ्या देशांमध्ये खेळू शकता
लिऑन पुढे म्हणाला की, तुम्ही ही मालिका तीन वेगवेगळ्या देशांमध्ये खेळू शकता. तो म्हणाला, "तुम्ही इंग्लंडमध्ये एक कसोटी, ऑस्ट्रेलियात एक आणि भारतात एक कसोटी खेळू शकता. तुमच्याकडे वेगवेगळी परिस्थिती असेल." आत्तापर्यंतचे पॉइंट टेबल पाहता यावेळीही वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणार असल्याचे दिसते. (हे देखील वाचा: ICC Test Rannking 2024: आयसीसी क्रमवारीत मोठा बदल, बाबर आझम टॉप 10 मधून बाहेर; तर जो रूटचा दबदबा कायम)
WTC चा अंतिम सामना पुढील वर्षी खेळवला जाईल
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 च्या अंतिम सामन्याची तारीख जाहीर करण्यात आली आहे. इंग्लंडचे ऐतिहासिक मैदान असलेल्या लॉर्ड्सवर 11-15 जून रोजी अंतिम सामना खेळवला जाईल. गरज भासल्यास 16 जून हा राखीव दिवस म्हणून ठेवला आहे. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या इतिहासातील हा तिसरा अंतिम सामना असेल आणि लॉर्ड्सवर प्रथमच विजेतेपदाची लढत होणार आहे.
ऑस्ट्रेलियाने शेवटची फायनल जिंकली होती, भारत दोन वेळा पराभूत
उल्लेखनीय आहे की, ऑस्ट्रेलियाने मागील जागतिक कसोटी चॅम्पियनशिप जिंकली होती. कांगारूंनी फायनलमध्ये टीम इंडियाचा पराभव केला. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पहिल्याच सायकलमध्ये न्यूझीलंडने विजेतेपद पटकावले होते. किवी संघाने अंतिम फेरीतही भारताचा पराभव केला. भारतीय संघ दोन्ही वेळा डब्ल्यूटीसी फायनलमध्ये पोहोचला, पण दोन्ही वेळा विजेतेपद मिळवू शकला नाही.
(The above story first appeared on LatestLY on Aug 14, 7684 05:25 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

