ICC World Cup 2023: टीम इंडियाच्या माजी प्रशिक्षकाने दिला खास सल्ला, आशिया चषक आणि विश्वचषकात 'या' तीन खेळाडूंना संघात करा समाविष्ट

दरम्यान, टीम इंडियाचे प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी एक खास सल्ला दिला आहे. टीम इंडियाच्या टॉप 7 फलंदाजांमध्ये तीन डावखुऱ्या फलंदाजांना ठेवल्याने आशिया चषक (Asia Cup 2023) आणि त्यानंतर भारतात होणाऱ्या विश्वचषक (ODI World Cup 2023) स्पर्धेसाठी भारतीय संघाची मधली फळी मजबूत होईल, असा विश्वास भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी व्यक्त केला आहे.

ICC World Cup 2023: टीम इंडियाच्या माजी प्रशिक्षकाने दिला खास सल्ला, आशिया चषक आणि विश्वचषकात 'या' तीन खेळाडूंना संघात करा समाविष्ट
Team India (Photo Credit - Twitter)

भारतीय क्रिकेट संघाला यावर्षी अनेक महत्त्वाच्या सामन्यांमध्ये भाग घ्यायचा आहे. यंदाच्या आशिया चषक (Asia Cup 2023) आणि एकदिवसीय विश्वचषक (ICC ODI World Cup 2023) स्पर्धेच्या तयारीत टीम इंडियाची (Team India) उणीव भासत आहे. आतापर्यंत संघाचे कोणतेही ठोस प्लेइंग 11 माहित नाहीत. दरम्यान, टीम इंडियाचे प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी एक खास सल्ला दिला आहे. टीम इंडियाच्या टॉप 7 फलंदाजांमध्ये तीन डावखुऱ्या फलंदाजांना ठेवल्याने आशिया चषक (Asia Cup 2023) आणि त्यानंतर भारतात होणाऱ्या विश्वचषक (ODI World Cup 2023) स्पर्धेसाठी भारतीय संघाची मधली फळी मजबूत होईल, असा विश्वास भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी व्यक्त केला आहे.

माजी प्रशिक्षक काय म्हणतात

शास्त्री म्हणाले की, अष्टपैलू रवींद्र जडेजा व्यतिरिक्त भारत इतर दोन डावखुऱ्या फलंदाजांना संघात ठेवू शकतो. त्याने स्टार स्पोर्ट्सला सांगितले की, फलंदाजीच्या क्रमवारीत आणखी तीन जागा आहेत जिथे मला वाटते की दोन डावखुरे फलंदाज ठेवले पाहिजेत. यातच निवडकर्त्यांची भूमिका महत्त्वाची ठरते कारण ते खेळाडूंवर लक्ष ठेवून असतात. कोणता खेळाडू चांगल्या फॉर्ममध्ये आहे हे त्यांना माहीत आहे. टिळक वर्मा चांगल्या फॉर्ममध्ये असतील तर त्यांना संघात स्थान द्या. यशस्वी जैस्वाल चांगली कामगिरी करत आहे असे तुम्हाला वाटत असेल तर त्याला ही संघात स्थान घ्या. (हे देखील वाचा: Ravi Shastri On Shikhar Dhawan: 'शिखर धवनला पाहिजे ते श्रेय मिळत नाही', टीम इंडियावर रवी शास्त्रींचं सर्वात मोठं वक्तव्य)

या खेळाडूंचा संघात करा समावेश 

31 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या आशिया चषक स्पर्धेत उजव्या हाताचे दोन फलंदाज केएल राहुल आणि श्रेयस अय्यर दुखापतीतून परतण्याची शक्यता असल्याने, तीन डावखुऱ्या फलंदाजांना प्लेइंग इलेव्हनमध्ये ठेवणे संघ व्यवस्थापनाला कठीण जाईल. यासोबतच शास्त्री यांनी इशान किशनची बाजू घेत तो चांगली कामगिरी करेल अशी आशा व्यक्त केली. ते म्हणाला की, जर तुम्ही गेल्या सहा ते आठ महिन्यांत ईशान किशनला घेत असाल आणि तो विकेटकीपिंगही करणार असेल, तर कोणत्याही परिस्थितीत त्याचे संघातील स्थान निश्चित झाले पाहिजे. ते काहीही असले तरी संघात दोन डावखुरे फलंदाज असले पाहिजेत.

टिळक वर्माकडे लक्ष द्या

याच मुद्द्यावर शास्त्री पुढे म्हणाले की, जडेजासह पहिल्या सात फलंदाजांमध्ये तीन डावखुरे फलंदाज असावेत. ईशान किशन गेल्या 15 महिन्यांपासून विकेट कीपिंग करतोय, मग दुसऱ्याचा शोध कशाला? भारताचे माजी प्रशिक्षकने टिळक वर्मा यांचेही कौतुक केले, ज्यांनी वेस्ट इंडिजमध्ये आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची चांगली सुरुवात केली. शास्त्री म्हणाले की, मी टिळक वर्मा यांच्यामुळे खूप प्रभावित आहे आणि मला डावखुरा फलंदाज हवा आहे. मला संघात एखादा डावखुरा फलंदाज हवा असेल तर मी त्याच्या नावाकडे नक्कीच लक्ष देईन.

(The above story first appeared on LatestLY on Aug 17, 2023 09:48 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).