Rohit Sharma On Virat Kohli: विराट कोहलीच्या प्रश्नावर वैतागला रोहित शर्मा, दिली 'ही' प्रतिक्रिया

रोहित शर्माला विराट कोहलीच्या खराब फॉर्मवर प्रश्न विचारण्यात आला तेव्हा तो म्हणाला, 'यार, विराटच्या फॉर्मबद्दल का बोलत आहेस? मला समजले नाही भाऊ. इतकी वर्षे खेळतोय. इतका महान फलंदाज. त्याला कोणत्याही आश्वासनाची गरज नाही.

Rohit Sharma (Photo Credit - Twitter)

लॉर्ड्स वनडेमध्ये इंग्लंडने टीम इंडियाचा (IND vs ENG) 100 धावांनी पराभव केला. मात्र, या पराभवापेक्षा विराट कोहलीबद्दलचा (Virat Kohli) चर्चा अधिक जास्त आहे. लॉर्ड्स वनडेत चांगली सुरुवात केल्यानंतर विराट कोहली विकेट फेकून निघून गेला. कोहलीच्या बॅटमधून 25 चेंडूत 16 धावा झाल्या. पुन्हा एकदा विराट कोहली अपयशी ठरला की प्रश्न निर्माण होणारच. कर्णधार रोहित शर्माला (Rohit Sharma) विराटच्या फॉर्मबद्दल प्रश्न विचारण्यात आला आणि त्यानंतर कर्णधाराने चोख उत्तर दिले. रोहित शर्माला विराट कोहलीच्या खराब फॉर्मवर प्रश्न विचारण्यात आला तेव्हा तो म्हणाला, 'यार, विराटच्या फॉर्मबद्दल का बोलत आहेस? मला समजले नाही भाऊ. इतकी वर्षे खेळतोय. इतका महान फलंदाज. त्याला कोणत्याही आश्वासनाची गरज नाही. मागच्या सामन्यातही मी म्हणालो होतो की फॉर्म वर-खाली होत राहतो. हा खेळाचा भाग आहे. हे सर्व खेळाडूंसोबत घडते.

Tweet

विराट पुनरागमन करेल 

रोहित शर्मा म्हणाला, 'माझा विश्वास आहे की जो फलंदाज इतकी वर्षे खेळत आहेत. इतक्या धावा केल्या. पुनरागमन करण्यासाठी त्याला फक्त एक-दोन डावांची गरज आहे. चर्चा होत राहतात हे आपल्याला माहीत आहे पण प्रत्येक खेळाडूची कामगिरी वर खाली होत जाते हे देखील बघायला हवे, पण खेळाडूच्या आत जी गुणवत्ता असते ती कधीच वाईट नसते.फक्त रोहित शर्माच नाही तर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने सुद्धा विराटला समर्थन दिले आहे. त्याने ट्विट करून लिहिले की, वाईट काळ लवकरच निघून जाईल. (हे देखील वाचा: Sourav Ganguly ने केली Virat Kohli ची पाठराखण, दिली 'अशी' प्रतिक्रिया)

विराट कोहली पुन्हा फ्लॉप

विराट कोहलीने लॉर्ड्सच्या वनडेतही चांगली सुरुवात केली होती. त्याच्या बॅटनेही तीन उत्कृष्ट चौकार मारले पण एका चुकीमुळे त्याचा खेळ संपला. इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर म्हणाला की कोहलीच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ शकत नाही. त्याने वर्षानुवर्षे चांगली कामगिरी केली आहे. वनडे मालिकेतील अंतिम सामना 17 जुलै रोजी होणार आहे. याआधी टीम इंडियाने टी-20 मालिका 2-1 अशी जिंकली होती.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement