Rohit Sharma: एका वर्षात सर्वाधिक विजय मिळवणारा रोहित शर्मा ठरला देशाचा पहिला कर्णधार, धोना आणि कोहलीला टाकले मागे

रोहित शर्मा यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाची T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विजयाची टक्केवारी 82.85 आहे. महेंद्रसिंग धोनीने (Dhoni) T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामन्यांमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व केले आहे. यादरम्यान त्याच्या देखरेखीखाली संघाला सर्वाधिक सामने जिंकता आले आहेत.

Rohit Sharma (Photo Credit - Twitter)

रोहित शर्माने (Rohit Sharma) भारतीय संघाची (Team India) कमान हाती घेतल्यापासून ब्लू आर्मी वेगळ्याच स्टाईलमध्ये दिसत आहे. शर्मा यांच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने आपला विजयी आलेख दिवसेंदिवस वाढवला आहे. रोहित शर्माने 2017 पासून 35 सामन्यांमध्ये T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व केले आहे. यादरम्यान, संघाने 29 सामने जिंकले आहेत, तर केवळ सहा सामन्यांमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. रोहित शर्मा यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाची T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विजयाची टक्केवारी 82.85 आहे. महेंद्रसिंग धोनीने (Dhoni) T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामन्यांमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व केले आहे. यादरम्यान त्याच्या देखरेखीखाली संघाला सर्वाधिक सामने जिंकता आले आहेत. यानंतर विराट कोहलीचे (Virat Kohli) नाव येते. कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ 2017 ते 2021 दरम्यान 50 सामने खेळला आहे. यादरम्यान संघाने 30 सामने जिंकले आहेत.

भारतीय संघाला सर्वाधिक T20 सामन्यांमध्ये विजय मिळवून देणाऱ्या या दोन खेळाडूंनंतर रोहित शर्माचे नाव येते. शर्माने फार कमी वेळात कर्णधारपदाच्या बाबतीत अनेक ठिकाणी धोनी आणि कोहलीला मागे टाकले आहे. या रेकॉर्डमधील एक विशेष विक्रम म्हणजे एका वर्षात सर्वाधिक विजय मिळवण्याच्या बाबतीत त्याने भारताच्या या दोन कर्णधारांना मागे टाकले आहे. (हे देखील वाचा: Asia Cup 2022: 'या' दोन खेळाडूंनी यावर्षी T20I मध्ये सर्वाधिक धावा केल्या, पण तरीही ते आशिया कपमधून बाहेर!)

एका वर्षात भारतीय संघाला T20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक विजय मिळवून देणारे कर्णधार:

महेंद्रसिंग धोनी - 15 विजय - 2016

विराट कोहली - 14 विजय - 2018

रोहित शर्मा - 16 विजय - 2022

खरं तर, भारतीय संघाचा कर्णधार म्हणून धोनीने वर्ष 2016 मध्ये सर्वाधिक 15 सामने जिंकले होते. त्याचवेळी, 2018 मध्ये कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 14 सामने जिंकले होते. मात्र, शर्माने आता या दोन फलंदाजांना मागे टाकले आहे. त्याच्या नेतृत्वाखाली यावर्षी (2022) टीम इंडियाने 16 सामने जिंकले आहेत. एवढेच नाही तर 2022 वर्ष संपायला अजून बरेच महिने बाकी आहेत. अशा परिस्थितीत शर्मा यांना अधिक वरचढ होण्याची संधी आहे.

 

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now